AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC Success Story: यूपीएससी परीक्षेत पुण्याची सुजाता जाधव अव्वल, अथक प्रयत्नांनंतर कसं मिळवलं यश? वाचा प्रेरणादायी प्रवास

पुण्यातील सुजाता जाधव या विद्यार्थिनीने यूपीएससी परीक्षेत देशात 22 वा आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. आर्थिक अडचणींना तोंड देत तिने यश मिळवले आहे. विशेष म्हणजे 2022 मध्ये मुलाखतीत अपयश पचवल्यानंतर तिने चिकाटीने प्रयत्न केले आणि यश संपादीत केलं आहे.

UPSC Success Story: यूपीएससी परीक्षेत पुण्याची सुजाता जाधव अव्वल, अथक प्रयत्नांनंतर कसं मिळवलं यश? वाचा प्रेरणादायी प्रवास
UPSC परीक्षेत पुण्याची सुजाता जाधव अव्वल, अथक प्रयत्नांनंतर कसं मिळवलं यश? वाचा
| Updated on: Dec 16, 2024 | 8:52 PM
Share

यूपीएससीच्या माध्यमातून भारतीय सांख्यिकी विभागाच्या परीक्षांचा नुकताच निकाल जाहीर झालाय. या परीक्षेत पुण्याची सुजाता जाधव ही विद्यार्थिनी देशात 22 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे तर महाराष्ट्रात पहिल्या नंबरने उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे सुजाता जाधव हिचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. सुजाता जाधव हिने ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी तिने आपल्या संघर्षाच्या काळात मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. “खूप सारा आनंद होतोय. मागच्या पाच वर्षांचे प्रयत्न सत्कारणी ठरले असं वाटत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्यासोबत जे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी देखील छान वाटत आहे. प्रयत्न सगळ्यांनी केले पाहिजेत”, असं सुजाता जाधव म्हणाली.

“मी २०१४ मध्ये पुण्यात आली होती. तेव्हा माझी नुकतीच बारावी पूर्ण झाली होती. विद्यार्थी सहायती समिती म्हणून मला मोठा मंच मिळाला. विद्यार्थी सहायची समिती हे एक मोठं वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाने त्याच्या सावलीत आम्हाला सर्वांना सामावून घेतलं. आतापर्यंतच्या माझ्या प्रवासात लीला पूनावाला फाऊंडेशनकडून शिष्यवृत्ती मिळाली. अजून एका सरकारी संस्थेकडून इन्सपायर स्कॉलरशिप मिळाली. जरी आर्थिक अडचणी असल्या तरी जिद्द, चिकाटी असेल तर तुम्ही तुमचं यश संपादीत करु शकता, असं मला वाटतं”, अशी प्रतिक्रिया सुजाता जाधव हिने दिली.

‘2022 मध्ये मुलाखतीत अपयश, पण तरीही…’

“मी आधीपासूनच प्रशासनात जायचं आहे, असं ठरवलं होतं. माझी लहानपणापासून ती इच्छा होती. मी जेव्हा पदव्युत्तर शिक्षण घेत होती तेव्हा माहिती मिळाली की, यूपीएससीत भारतीय सांख्यिकी विभाग आहे. माझं शिक्षणही त्याच विभागातून झालेलं आहे. मी 2022 मध्ये सुद्धा यूपीएससीची मुलाखत दिली होती. पण त्यावेळी माझी निवड झालं नव्हतं. तेव्हा खूपच वाईट वाटलं होतं. तेव्हा मी स्वत:ला म्हटलं होतं की, सुजा तुझ्याकडे दोनच ऑप्शन आहेत, एकतर लढायचं किंवा रडायचं. मग मी लढण्याचं ऑप्शन स्वीकारलं आणि परत चिकाटीने प्रयत्न करुन आता हे यश संपादीत केलं”, असा अनुभव सुजाताने सांगितला.

विद्यार्थ्यांना काय मेसेज देणार?

“स्पर्धा परीक्षा हा खूप चांगला मंच आहे. पण तरीही तुम्ही तुमचा करिअरचा प्लॅन बी रेडी ठेवायला हवा. कारण अनेक जण बारावीनंतर लगेच यूपीएससी परीक्षांची तयारी करतात. पण ४० पैकी केवळ १ मुलाची निवड होत असेल तर आधी आपण आपला प्लॅन बी तयार ठेवा आणि मगच या क्षेत्राकडे वळा”, असा मोलाचा सल्ला सुजाता जाधव यांनी यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.

Follow Us
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.