AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC Final Result 2021 : यूपीएससीचा फायनलचा निकाल जाहीर, श्रुती शर्मा देशात पहिली, प्रियंवदा अशोक म्हाडदळकर महाराष्ट्रातून पहिली!

upsc result 2022 : 2021 मध्ये यूपीएससीनं मुख्य परिक्षेचं आयोजन केलं होतं तर जानेवारी 2022 मध्ये उमेदवारांची मुलाखत झाली होती. त्यानंतर आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्यांची निवड झालेली आहे, ते उमेदवार IAS, IPS, IFS आणि केंद्रीय सेवेतल्या A आणि B ग्रुपमध्ये प्रशासकिय सेवा देतील.

UPSC Final Result 2021 : यूपीएससीचा फायनलचा निकाल जाहीर, श्रुती शर्मा देशात पहिली, प्रियंवदा अशोक म्हाडदळकर महाराष्ट्रातून पहिली!
| Updated on: May 30, 2022 | 4:08 PM
Share

नवी दिल्ली : यूपीएससीचा फायनल निकाल (UPSC Result 2022) जाहीर झाला असून टॉप थ्री मध्ये मुलींनी बाजी मारलीय. पहिल्या तीनही क्रमांकावर मुली आहे. श्रुती शर्मा (Shruti Sharma) ही देशात पहिली आलीय. तर दुसऱ्या क्रमांकावर अंकिता अग्रवाल (Ankita Agrawal) तर तिसऱ्या क्रमांकावर गामिनी सिंगला (Gamini Singhla) आहे. टॉप फाईवमध्ये फक्त एकच मुलगा आहे आणि त्याचं नाव आहे उत्कर्ष द्विवेदी (Utkarsh Dvivedi). चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा मुलगीच आहे आणि ती आहे ऐश्वर्या वर्मा. टॉप फाईव्हमध्ये एकही मराठी नाही हेही निकालाचं वैशिष्ट्य मानावं लागेल. शर्मा, अग्रवाल,वर्मा, द्विवेदी हे नेमके कोणत्या राज्यातले रहिवाशी आहेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण यादीवर एक नजर टाकली तर मराठमोळी आडनावं मात्र शोधूनही सापडणे अवघड आहे. विशेषत: टॉप 10 मध्ये तर नाहीच.

2021 मध्ये यूपीएससीनं मुख्य परिक्षेचं आयोजन केलं होतं तर जानेवारी 2022 मध्ये उमेदवारांची मुलाखत झाली होती. त्यानंतर आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्यांची निवड झालेली आहे, ते उमेदवार IAS, IPS, IFS आणि केंद्रीय सेवेतल्या A आणि B ग्रुपमध्ये प्रशासकिय सेवा देतील. एकूण 685 उमेदवारांची निवड झालीय. त्यात जनरल कॅटेगरीचे 244, ईडब्लूएसचे 73, ओबीसीचे 203, एससीचे 105, एसटीचे 60 अशा उमेदवारांचा समावेश आहे. एकाचा निकाल आयोगानं राखून ठेवलेला आहे.

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

यूपीएससीचा जो निकाल आलाय, त्यात महाराष्ट्रातून प्रियंवदा अशोक म्हाडदळकर ही पहिली आली आहे. तिची ऑल इंडिया रँक 13 वी आहे. टॉप 15 मध्ये दिसणारं हे एवढं एकच नाव आहे. पहिल्या 15 मध्ये कोण कोण आहे, त्यांची नावं खालील प्रमाणे-

ऑल इंडिया रँक

6- यक्ष चौधरी

7- सम्यक जैन

8- इशिता राठी

9- प्रीतमकुमार

10- हरकिरतसिंग रंधवा

11- शुभांकर प्रत्यूष पाठक

12- यशरथ शेखर

13- प्रियंवदा अशोक म्हाडदळकर

14- अभिनव जैन

15- सी यशवंतकुमार रेड्डी

काही मराठी नावं

दिक्षा जोशी

शुभांकर पाठक

सोनाली देव

अंकिरृत दास

निखिल महाजन

अनिकेत ज्ञानेश्वर हिरडे

प्रखर चंद्राकर

चारू धनकर

पंकज यादव

अजेय राठोर

आदित्य काकडे

मयंक पाठक

अनन्या अवस्थी

निखील बसवराज पाटील

विनय कुमार गदगे

लोकेश यादव

आशू पंत

ओंकार मधुकर पवार

अक्षय अनिल वाखारे

अक्षय संजय महाडिक

तन्मयी सुहास देसाई

अभिजीत राजेंद्र पाटील

परूल यादव

तन्मय काळे

इशान अजित टिपणीस

सोहन सुनिल मांढरे

सौम्यरंजन प्रधान

दीप रामचंद्र शेठ

वैभव नितीन काजळे

आकाश जोशी

उषा यादव

राहुल देशमुख

विमल कुमार पाठक

सुमित सुधाकर रामटेके

शुमैला चौधरी

अभिषेक यादव

देवराज मनिष पाटील

अनिकेत लक्ष्मिकांत कुलकर्णी

राजेंद्र चौधरी

निरज विजय पाटील

आशिष अशोक पाटील

अमित लक्ष्मण शिंदे

अभय अनिल सोनारकर

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.