AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra SSC Result 2021 | ना परीक्षा, ना टेन्शन, तरीही विद्यार्थी नापास, दहावीच्या नापास विद्यार्थ्यांचा आकडा किती?

Maharashtra SSC Result : कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे आणि त्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे यंदा दहावीची परीक्षा झालीच नाही... त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचं अजिबात टेन्शन नव्हतं.... मात्र तरीही काही शेकडो विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले आहेत.

Maharashtra SSC Result 2021 |  ना परीक्षा, ना टेन्शन, तरीही विद्यार्थी नापास, दहावीच्या नापास विद्यार्थ्यांचा आकडा किती?
फाईल फोटो
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jul 16, 2021 | 1:04 PM
Share

Maharashtra SSC Result 2021 : कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे आणि त्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे यंदा दहावीची परीक्षा झालीच नाही… त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचं अजिबात टेन्शन नव्हतं…. मात्र तरीही काही विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले आहेत तर राज्यातल्या एकूण 9 शाळांचा निकाल शून्य टक्के लागलेला आहे.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. परंतु निकाल जाहीर करताना आणि प्रसिद्ध केलेल्या नोटमध्ये देखील एक्झॅट अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आकडा किती, याचा आकडा दिलेला नाही.

यंदाच्या वर्षी राज्याचा निकाल 99.95 टक्के लागला असून, कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. यावेळी काही विद्यार्थ्यांचे निकाल राखी तर सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. यामध्ये काही हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचे निकाल राखीव कसासाठी, नेमकं कारण काय?

4922 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. यात सर्वाधिक विद्यार्थी रिपीटर्स आहेत, ज्यांचे मागील 3,4 वर्षांच्या गुणपत्रिका तपासणे आवश्यक आहे. तीन वर्षांच्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही. त्यांचा निकाल नंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्यांच्या आधीच्या निकालाच्या प्रती पडताळण्याचे काम सुरु असून, यानंतर या विद्यार्थांचे निकाल जाहीर होतील.

957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 12384 शाळांचा निकाल शंभर टक्के, 9 शाळांचा निकाल शून्य टक्के

दहावीच्या निकालात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नेहमीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यंदाच्या वर्षी 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळालेले आहेत. 83 हजार 262 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. 12384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 9 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला.

(What is the number of students who failed maharashtra SSC Result)

हे ही वाचा :

Maharashtra SSC Result 2021 | दहावीचा निकाल जाहीर, ‘इतक्या’ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव, जाणून घ्या नेमकं कारण काय?

Maharashtra SSC Result 2021 Toppers : यंदा तर रेकॉर्डच मोडला ब्वा पोरांनी…, तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के!

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत