
Romantic Song: रोमँटिक गाणी केवळ चित्रपटांपुरती मर्यादित राहत नाहीत तर ती लाखो लोकांच्या वैयक्तिक आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनतात. विशेषतः जुन्या काळातील गाण्यांमध्ये नात्यांची खोली, भावना आणि प्रामाणिकपणा स्पष्टपणे जाणवतो. ही गाणी ऐकताना असे वाटते जणू कोणी आपलीच प्रेमकथा सांगत आहे. म्हणूनच आजच्या डिजिटल युगातही ही गाणी लाखो लोकांच्या प्लेलिस्टमध्ये हमखास दिसतात. असंच एक अत्यंत रोमँटिक, मधुर आणि काळाच्या कसोटीवर उतरलेलं गीत म्हणजे ‘आजा पिया तोहे प्यार दूं’.
हे गाणे 1960–70 च्या दशकात प्रदर्शित झाले आणि रिलीज होताच प्रेक्षकांच्या ओठांवर रुळले. 1967 साली प्रदर्शित झालेल्या ‘बहारों के सपने’ या चित्रपटातील हे गाणे आजही प्रेमगीतांच्या यादीत आपले खास स्थान टिकवून आहे. गाण्याची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की ते त्या काळात रेडिओ हे गाणं सतत वाजत असे.
आशा पारेख आणि राजेश खन्नांची मोहक केमिस्ट्री
हे गाणे आशा पारेख आणि राजेश खन्ना यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. जरी हा काळ ब्लॅक अँड व्हाइट सिनेमाचा असला तरी गाण्यात आशा पारेख यांचे सौंदर्य आणि भावभावना प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या होत्या. त्यांच्या साध्या अभिनयाने आणि निरागस भावांनी गाण्याला वेगळीच उंची दिली.
या गाण्याला अजरामर बनवण्यात लता मंगेशकरांच्या मधुर आवाजाचा मोठा वाटा आहे. त्यांच्या स्वरांनी गाण्यातील प्रेमभावना अधिक खोलवर पोहोचवल्या. याशिवाय, आर. डी. बर्मन यांनी दिलेले संगीत आणि मजरूह सुल्तानपुरी यांनी लिहिलेले हृदयस्पर्शी बोल यामुळे हे गाणे काळाच्या पलीकडे गेले.
साधेपणा आणि भावनिक खोली
‘आजा पिया तोहे प्यार दूं’ या गाण्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची साधी पण भावनिक मांडणी. त्यामुळे प्रेक्षक थेट कथेशी जोडले गेले. गाण्यातील प्रेम, ओढ आणि समर्पण आजही तितक्याच तीव्रतेने जाणवते.
आजच्या डिजिटल काळातही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. यूट्यूब, सोशल मीडिया, रील्स आणि शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून हे गाणे नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. कोट्यवधी वेळा हे गाणे पाहिले आणि ऐकले गेले आहे.