AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉमेडी शो, अभद्र टिप्पणी… रागात आमिर खान म्हणाला, ‘असे विनोद करण्यासाठी मी 14 वर्षांचा नाही आणि…’

'असे विनोद करण्यासाठी मी 14 वर्षांचा नाही आणि...', अभद्र टिप्पणीवर आमिर खानचा संताप..., सध्या 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या एका एपिसोडमुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.

कॉमेडी शो, अभद्र टिप्पणी... रागात आमिर खान म्हणाला, 'असे विनोद करण्यासाठी मी 14 वर्षांचा नाही आणि...'
| Updated on: Feb 12, 2025 | 12:12 PM
Share

समय रैना याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ नुकताच झालेल्या एका भागात युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वी मखीजा हिच्यासोबत अन्य लोकं देखील उपस्थित होते. पण शोमध्ये आई – वडिलांबद्दल अभद्र शब्दांचा उल्लेथ करण्यात आला. सांगायचं झालं तर, हा पहिला शो नाही ज्यामध्ये वाईट शब्दांचा वापर केल्यामुळे शो आणि कलाकार वादाच्या भोवऱ्यात अडकले. याआधी 2015 मध्ये एक शो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ज्यावर अभिनेता आमिर खान याने वादग्रस्त वक्तव्य केलं.

सध्या ज्या शोबद्दल चर्चा रंगल आहे, त्या शोचं नाव ‘AIB’ असं होतं. 2015 मध्ये शोच्या एका एपिसोडमध्ये करण जोहर आणि अनेक कॉमेडियनने अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांच्यावर विनोद केले होते. दोघांची गर्लफ्रेंड, आकर्षक करियर शिवाय त्यांच्या लैंगिकतेवरही कमेंट्स केल्या होत्या. या कमेंट्स ऐकून लोकं आश्चर्यचकित झाले होते.

या प्रकरणानंतर अनेक तक्रारी दाखल झाल्या. धमक्या दिल्या होत्या. युट्युबवरून व्हिडिओही काढून टाकण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप लोकांनी केला. तेव्हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनेकांनी विरोध देखील केला.

दरम्यान, एका अभिनेत्याने केलेली टीका तुफान चर्चेत आली. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता आमिर खान आहे. ’25 शिव्या देऊन तुम्हाला वाटत असेल मी आनंदी आणि इंप्रेस होईल. तर शिव्यांमुळे इंप्रेस होण्याचं माझं वय निघून गेलं आहे. आता मी 14 वर्षांचा राहिलेलो नाही, जो शिव्या ऐकून हाहाहा हसेल…’

‘मला हसवायचं असेल तर, कोणाचं नाव न घेता… कोणाच्या भावना न दुखवता मला आनंदी करा. जर तुम्ही एखाद्याच्या रंगावर भाष्य केलं किंवा कोणाच्या लैंगिकतेवर टिप्पणी केली आणि असं वाटलं की मी तुमच्याबरोबर हसेन, तर मी त्यावर हसणार नाही… असं देखील अभिनेता म्हणाला. ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या वादावर आमिर खानचे हे शब्द विनोदाची रेषा कुठे ओढली पाहिजे हे दाखवत आहे.

सांगायचं झालं  तर, रणवीर याने शोमध्ये आई – वडिलांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळे युट्यूबर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले असून पोलीस याप्ररकरणी पुढील तपास करत आहेत.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.