AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींचं नाव घेताच आमिर खानवर भडकले नेटकरी; म्हणाले ‘आता जाग आली का?’

अभिनेता आमिर खानने ऑपरेशन सिंदूरबद्दल सोशल मीडियावर नुकतीच पोस्ट लिहिली आहे. यावरून नेटकरी त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत. इतके दिवस कुठे गायब होतास, असा सवाल नेटकऱ्यांनी आमिरला केला आहे.

मोदींचं नाव घेताच आमिर खानवर भडकले नेटकरी; म्हणाले 'आता जाग आली का?'
Aamir KhanImage Credit source: Instagram
| Updated on: May 13, 2025 | 8:51 AM
Share

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे चोख प्रत्युत्तर दिलं. 22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. त्यानंतर 7 मे रोजी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमेजवळील राज्यांमध्ये हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली. यालाही भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. एकीकडे देशभरात या ‘ऑपरेशन सिंदूर’चं कौतुक होत असतानाच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यावर मौन बाळगल्याने टीका होत आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पाच दिवसांनंतर अभिनेता आमिर खानने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. यावरून नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.

सोशल मीडियावर आमिर खानचं स्वत:चं अधिकृत अकाऊंट नसलं तरी आमिर खान प्रॉडक्शन्स या त्याच्या निर्मिती संस्थेच्या अकाऊंटवरून तो व्यक्त होत असते. ऑपरेशन सिंदूरविषयी त्याने सोमवारी रात्री उशिरा एक पोस्ट लिहिली आहे. ‘ऑपरेशन सिंदूरच्या हिरोंना सलाम. आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या सशस्त्र दलांच्या धैर्य, शौर्य आणि अढळ वचनबद्धतेबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्त्व आणि दृढनिश्चयाचेही मी आभार मानतो. जय हिंदी’, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय.

आमिरने जरी या पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं असलं तरी त्याची वेळ चुकल्याचं नेटकरी म्हणत आहेत. त्याचवरून अनेकांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. ‘इतके दिवस शब्द शोधत होतास का’, असा खोचक सवाल एकाने केला. तर ‘आतापर्यंत कुठे गायब होतास? बॉयकॉट करायला सुरुवात केली तर लगेच पोस्ट लिहिली’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘आता झोपेतून उठला वाटतं’, असाही टोला नेटकऱ्यांनी लगावला आहे.

फक्त आमिरच नव्हे तर सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांसारख्या मोठ्या कलाकारांनीही ऑपरेशन सिंदूरबद्दल मौन बाळगल्याने चाहते चिडले होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. त्याआधी ते सतत ट्विटरवर ब्लँक पोस्ट लिहित होते. खरे हिरो हे चित्रपटांमध्ये काम करणारे नसून सीमेवर लढणार आहेत, असे कमेंट्स करत नेटकऱ्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.