AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत मुंबई सोडण्याचा निर्णय का घेतला याबद्दल खुलासा केला आहे.

| Updated on: Feb 09, 2026 | 6:03 PM
Share
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करताना दिसते. मालिका असो वा चित्रपट, आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने कायम प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करताना दिसते. मालिका असो वा चित्रपट, आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने कायम प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.

1 / 7
अभिनयासोबतच प्रार्थना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. मात्र अनेकांना हे माहिती नसेल की, प्रार्थना मुंबई सोडून एका निवांत अशा ठिकाणी राहण्यासाठी गेली आहे. कुठे आहे ते ठिकाण?

अभिनयासोबतच प्रार्थना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. मात्र अनेकांना हे माहिती नसेल की, प्रार्थना मुंबई सोडून एका निवांत अशा ठिकाणी राहण्यासाठी गेली आहे. कुठे आहे ते ठिकाण?

2 / 7
काही वर्षांपूर्वीच प्रार्थना आपल्या नवऱ्यासोबत मुंबई सोडून अलिबागला शिफ्ट झाली आहे. नुकत्याच एका दिलखुलास मुलाखतीत तिने हा निर्णय का घेतला याबद्दल खुलासा केला आहे.  मुंबईपासून दूर अलिबागला राहण्यामागचं कारण काय?

काही वर्षांपूर्वीच प्रार्थना आपल्या नवऱ्यासोबत मुंबई सोडून अलिबागला शिफ्ट झाली आहे. नुकत्याच एका दिलखुलास मुलाखतीत तिने हा निर्णय का घेतला याबद्दल खुलासा केला आहे. मुंबईपासून दूर अलिबागला राहण्यामागचं कारण काय?

3 / 7
यावर उत्तर देताना ती म्हणाली, 'सध्या माझ्या घरी एकूण 12 श्वान आहेत. या सगळ्यांसोबत मी फार्महाऊसवर वेळ घालवते, खेळते. त्यांच्याबरोबर दिवस कसा जातो, हे खरंच कळत नाही. जेव्हा मी अलिबागला असते, तेव्हा मी अभिनेत्री नसते… तेव्हा मी फक्त त्यांची आई असते. अलिबागमध्ये मी माझं आयुष्य अतिशय आनंदात आणि शांतपणे जगते. खरं सांगायचं तर मला असंच आयुष्य हवं आहे.'

यावर उत्तर देताना ती म्हणाली, 'सध्या माझ्या घरी एकूण 12 श्वान आहेत. या सगळ्यांसोबत मी फार्महाऊसवर वेळ घालवते, खेळते. त्यांच्याबरोबर दिवस कसा जातो, हे खरंच कळत नाही. जेव्हा मी अलिबागला असते, तेव्हा मी अभिनेत्री नसते… तेव्हा मी फक्त त्यांची आई असते. अलिबागमध्ये मी माझं आयुष्य अतिशय आनंदात आणि शांतपणे जगते. खरं सांगायचं तर मला असंच आयुष्य हवं आहे.'

4 / 7
प्रार्थनाने सांगितलं की, कोव्हिडनंतर तिच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला. ती म्हणाली, 'कोव्हिडनंतर एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आपण कधीही जगणं विसरता कामा नये.

प्रार्थनाने सांगितलं की, कोव्हिडनंतर तिच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला. ती म्हणाली, 'कोव्हिडनंतर एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आपण कधीही जगणं विसरता कामा नये.

5 / 7
कुटुंबासाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आम्ही मुंबईत राहत होतो, तेव्हा माझा नवरा अभी सकाळी आठ वाजता ऑफिसला जायचा आणि रात्री 12 वाजेपर्यंत घरी यायचा. मीही शूटिंग संपवून उशिराच घरी परतायचे. त्यामुळे आम्हाला एकमेकांसाठी वेळच मिळत नव्हता.'

कुटुंबासाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आम्ही मुंबईत राहत होतो, तेव्हा माझा नवरा अभी सकाळी आठ वाजता ऑफिसला जायचा आणि रात्री 12 वाजेपर्यंत घरी यायचा. मीही शूटिंग संपवून उशिराच घरी परतायचे. त्यामुळे आम्हाला एकमेकांसाठी वेळच मिळत नव्हता.'

6 / 7
आता आम्ही कामाचं आणि वैयक्तिक आयुष्याचं नीट नियोजन केलं आहे. जेव्हा काम असतं, तेव्हा आम्ही मुंबईत चार दिवस राहतो आणि काम पूर्ण करतो. त्यानंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवार आम्ही अलिबागला जातो. घरी असताना फक्त कुटुंबालाच वेळ द्यायचा असा आमचा ठाम निर्णय आहे.

आता आम्ही कामाचं आणि वैयक्तिक आयुष्याचं नीट नियोजन केलं आहे. जेव्हा काम असतं, तेव्हा आम्ही मुंबईत चार दिवस राहतो आणि काम पूर्ण करतो. त्यानंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवार आम्ही अलिबागला जातो. घरी असताना फक्त कुटुंबालाच वेळ द्यायचा असा आमचा ठाम निर्णय आहे.

7 / 7
Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.