AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान होणार की नाही याबाबत खलबतं सुरू आहेत. हा सामना व्हावा यासाठी आयसीसीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, बांगलादेशने भारताच्या बाजूने कौल दिला आहे. तर पाकिस्ताननेही तीन अटी ठेवल्याचं बोललं जात आहे.

IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी
IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटीImage Credit source: PTI/GETTY
| Updated on: Feb 09, 2026 | 6:02 PM
Share

IND vs PAK Match, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियोजित आहे. हा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणार आहे. पण या सामन्याकडे पाकिस्तानने पाठ फिरवली आहे. त्यामुळे हा सामना होईल की नाही हे आता सांगणं कठीण आहे. पाकिस्तान सरकारने तर भारताविरुद्ध खेळणार नाही याबाबतची घोषणा आधीच केली आहे. तर भारतीय संघ मात्र या सामन्यासाठी श्रीलंकेत जाणार आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल सांगता येत नाही. आशिया कप स्पर्धेतही पाकिस्तानच्या संघाने असा पवित्रा घेतला होता. खूप वेळ हॉटेलमध्ये थांबल्यानंतर सामन्यासाठी मैदानात उतरले होते. असंच काहीसं आताही होऊ शकतं. या सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीमध्ये खलबतं सुरू आहेत. त्यात बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही भाग घेतली आहे. या दरम्यान, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान विनंती केली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांना विनंती केली की, टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताविरूद्धचा सामना खेळावा. ही विनंती त्यांनी रविवारी लाहोरमध्ये झालेल्या बैठकीत केली. यात आयसीसीचे उपाध्यक्ष आणि इमरान ख्वाजा यांची उपस्थिती होती. आता त्यांच्या विनंतीला मान देऊन पाकिस्तान खेळणार की नाही हे अजून अस्पष्ट आहे. कारण बांगलादेशला या स्पर्धेतून वगळल्यानंतर पाकिस्तानने आक्रमक पवित्रा घेतला होता. इतकंच काय तर पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामना खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आता भारत पाकिस्तान वाद वाढू नये यासाठी बांगलादेशने पावलं उचलली आहेत. बांगलादेशने विनंती केल्याने पाकिस्तानचा राग थंड होऊ शकतो.

पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी

मिडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानने या वादात आपली पोळी शेकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षात भारत पाकिस्तान द्विपक्षीय मालिका झाल्या नसल्याने पीसीबीचं मोठं नुकसान झालं आहे. असं असताना तीन अटी आयसीसीपुढे ठेवल्या आहेत. पाकिस्तानला आयसीसीकडून जास्त मानधन हवं आहे. तसेच भारत पाकिस्तान द्विपक्षीय मालिका सुरू कराव्या. तसेच टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी हँडशेक करावा अशा तीन अटी ठेवल्या आहेत.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.