AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा

Aimim : एमआयएमच्या एका बड्या नेत्याने लोकसंख्येबाबत मोठे विधान केले आहे. "हम दो, हमारे दो दर्जन" असं या नेत्याने म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हम दो, हमारे दो दर्जन... ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
Shaukat AliImage Credit source: Google
| Updated on: Feb 09, 2026 | 5:54 PM
Share

राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात लग्न 19 ते 25 वय असताना करावे आणि जोडप्याला तीन मुले असावीत. यामुळे पालकांचे आणि कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते असं विधान केले होते. यानंतर आता असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमच्या नेत्याने लोकसंख्यवाढीबाबत अजब नारा दिला आहे. उत्तर प्रदेशचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी मुरादाबाद येथील एका सभेत बोलताना “हम दो, हमारे दो दर्जन” ही घोषणा दिली. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण देशात वाद निर्माण झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हम दो, हमारे दो दर्जन

शौकत अली यांनी मुरादाबाद येथील सभेत “हम दो, हमारे दो दर्जन” ही घोषणा दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, मला आठ मुले आहेत, आणि माझ्या मोठ्या भावाला 16 मुले आहेत. आम्ही सर्व मुस्लिमांना शक्य तितकी मुले जन्माला घालण्यास उद्युक्त करू. अल्लाह देत असल्याने, घेत राहा. जोपर्यंत तो देत राहतो तोपर्यंत घेत राहा. देशातील काही लोकांना काळजी आहे की आपली लोकसंख्या वाढत आहे, परंतु जर लोकसंख्या वाढली तर देश अधिक मजबूत होईल.’

शौकत अली यांच्या भारताची चीनशी तुलना

शौकत अली यांनी भारताची तुलना चीनशी केली. ते म्हणाले की, “चीनची लोकसंख्या जास्त आहे आणि ती बलवान आहे. म्हणून, जर आपली लोकसंख्या वाढली तर आपला देश बलवान होईल. ‘आम्ही दोन, आमचे दोन डझन,’ लोकांना आपल्या लोकसंख्येची समस्या का आहे? लोकांना आपल्या संख्येची काळजी का वाटते? जे लग्न करत नाहीत तेच हिंदू बांधवांना चार मुले असावीत असा सल्ला देतात. आम्ही म्हणतो, हिंदू बांधवांना चार नाही तर चौदा मुले असावीत, जेणेकरून देश बलवान होईल.”

पुढे त्यांनी मॉब लिंचिंग आणि मुस्लिमांच्या छळावर भाष्य केले. अली म्हणाले की, “हिंदू संघटनांशी संबंधित महिलांनीही मुस्लिमांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली आहे. आमच्या मदरशांना दहशतवादाचे अड्डे म्हटले जात आहे. आमच्या मुलींचे हिजाब सार्वजनिक ठिकाणी काढून टाकले जात आहेत. आमची दाढी उपटली जात आहे. लोक सुरक्षित नाहीत.”