AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्यांना वाटतं मी सलमान भाईचे पैसे उडवतो..; भावोजी आयुष शर्माने केलं स्पष्ट

अभिनेता सलमान खानचा भावोजी अर्थात बहीण अर्पिता खानचा पती आयुष शर्माला अनेकदा ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. सलमाननेच आयुषला बॉलिवूडमध्ये लाँच केलं. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीपासूनच त्याला घराणेशाहीच्या टीकेचा सामना करावा लागतोय.

ज्यांना वाटतं मी सलमान भाईचे पैसे उडवतो..; भावोजी आयुष शर्माने केलं स्पष्ट
आयुष शर्मा, अर्पिता खान, सलमान खानImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 23, 2024 | 11:11 AM
Share

अभिनेता सलमान खानचा भावोजी म्हणजेच त्याची बहीण अर्पिता खानचा पती आयुष शर्मा याने ‘लव्हयात्री’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. आता आयुष पहिल्यांदाच दुसऱ्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत बनलेल्या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत आयुष विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाला. पैशांसाठी आणि बॉलिवूडमध्ये सहज एण्ट्री मिळवण्यासाठी अर्पिताशी लग्न केलं, या ट्रोलिंगवरही त्याने प्रतिक्रिया दिली. त्याचसोबत जेव्हा ‘लव्हयात्री’ फ्लॉप झाला तेव्हा सलमान आणि त्याच्यामध्ये फोनवरून काय बोलणं झालं, याविषयीही त्याने सांगितलं.

तो म्हणाला, “आता मी माझ्या इनकम टॅक्सची माहितीसुद्धा इन्स्टाग्रामवर शेअर करू का? माझ्याकडे किती पैसा आहे आणि त्याचं मी काय करतो, हेसुद्धा आता लोकांना दाखवू का? 2018 मध्ये जेव्हा जेव्हा लव्हयात्री बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला जेव्हा सलमान भाईने मला त्या रात्री फोन केला होता. मला काय वाटतंय हे त्याला जाणून घ्यायचं होतं. त्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याला मी म्हणालो, मला माफ कर. मी तुझे पैसे बुडवले. तेव्हा सलमान भाई मला म्हणाला की तू वेडा झाला आहेस का? असं का बोलतोय? माझ्या डोक्यात काय विचार होते, मला काय वाटत होतं हे त्याला जाणून घ्यायचं होतं.”

View this post on Instagram

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

आयुषचे वडील आणि आजोबा राजकारणी आहेत. कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असताना आयुषला अभिनयात करिअर करायचं होतं. मात्र त्याच्या वडिलांचा या निर्णयाला विरोध होता. याविषयी त्याने सांगितलं, “माझे वडील मी अभिनेता होण्याच्या निर्णयाविरोधात होते. त्यांच्या विरोधात जाऊन मी तब्बल 300 ऑडिशन्स दिले होते. पण कुठेच माझं काम होत नव्हतं. एके रात्री माझ्याकडे खायला फक्त 20 रुपये शिल्लक होते. त्यानंतर सकाळी नाश्त्यासाठीही पैसे नव्हते. लव्हयात्री फ्लॉप झाल्यानंतर जेव्हा अंतिम हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा मला याचं समाधान होतं की कुटुंबीयांना त्यांनी गुंतवलेले पैसे मिळाले. चित्रपटाचे सॅटेलाइट आणि इतर हक्क विकले गेले होते आणि त्यातून बऱ्यापैकी नफा कमावला होता. त्यामुळे माझ्यावर खर्च केलेले पैसे त्यांना परत मिळाले, याचा जास्त आनंद होता.”

आयुषने अर्पिता खानशी 18 नोव्हेंबर 2014 रोजी लग्न केलं. या दोघांना आयात ही मुलगी आणि अहिल हा मुलगा आहे. “जे लोक असा विचार करतात की मी सलमान भाईचे पैसे उडवतो, त्यांना मी हे सांगू इच्छितो की मी कधीच त्याच्याकडून पैसे घेतले नाहीत. मी हे स्पष्ट केल्यानंतरही लोक मला ट्रोल करतील. मी खोटं बोलतोय असं म्हणतील. पण आता मला त्या गोष्टींचा फरक पडत नाही. माझ्यासाठी हेच महत्त्वाचं आहे की मी माझ्या मुलांच्या शाळेची फी भरतो, त्यांच्यासाठी चांगलं घर आहे आणि त्यांना मी चांगल्या वातावरणात मोठं करू शकतो”, असं त्याने स्पष्ट केलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.