AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चला कश्मीरला जाऊया; दहशतवादी हल्ल्यानंतर मराठमोळा अभिनेता पोहोचला पहलगाममध्ये

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण असून तशीच भीती आता लोकांच्याही मनात आहे. पण या हल्ल्यानंतर लोकांच्या मनातील भीती काढण्यासाठी अभिनेते अतुल कुलकर्णी थेट काश्मीरला गेले आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर काश्मीरची परिस्थिती दाखवून लोकांना धीर दिला. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चला कश्मीरला जाऊया; दहशतवादी हल्ल्यानंतर मराठमोळा अभिनेता पोहोचला पहलगाममध्ये
Pahalgam attack, Atul Kulkarni Kashmir tripImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Apr 27, 2025 | 5:23 PM

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगभरात संतप्त वातावरण आहे. या घटनेत 27 पर्यटकांची हत्या करण्यात आली तर 20 पेक्षा जास्त जण जखमी झाले. या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे आता काश्मीरमध्ये शुकशुकाट पाहायाला मिळत आहे. या घटनेवर सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनीच राग व्यक्त केला आहे. तर या सर्व घटनेचा परिणाम काश्मीरच्या पर्यटनावरही पडला आहे. तिथले पर्यटन ठप्प झालं आहे. लोकांच्या मनात तिथे जाण्यासाठी भीतीचं वातावरण आहे.

अतुल कुलकर्णी थेट काश्मीरला

तिच भीती घालवण्यासाठी एक अभिनेता थेट काश्मीरला गेला आहे. होय, राठी आणि हिंदी चित्रपट इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी काश्मीरला गेले आहेत. हल्ल्याच्या आठवडाभरानंतरच अतुल कुलकर्णी यांनी खरोखरचं धाडस दाखवत काश्मीरला जाऊन लोकांच्या मनातील भीती काढण्याचा प्रयत्न केला. लोकांना हिंमत देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं आहे.

अतुल कुलकर्णींची पोस्ट व्हायरल 

एवढंच नाही तर अतुल कुलकर्णी पहलगाम हल्ल्यावरून परखड मतही मांडलं आहे. त्यांनी काश्मीरला जाताना विमान प्रवासापासून ते तिथे पोहोचल्यावर तिथल्या परिस्थितीचे सर्व अपडेट लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. त्यांनी हे सर्व फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अतुल कुलकर्णीने X वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी विमानाच्या तिकिटांचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला त्याने कॅप्शन दिले आहे, ‘मुंबई ते श्रीनगर, काश्मीर.’

अभिनेत्याने काश्मीरला जाताना विमान प्रवासाचे फोटो 

त्यानंतर अतुल कुलकर्णीने फ्लाइटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे, ‘फ्लाइट पूर्ण रिकामी आहे आणि आपल्याला ही पुन्हा भरायची आहे आणि दहशतवादाला हरवायचं आहे.’ त्यामुळे काश्मीरला जाण्याची भीती घालवण्यासाठी अतुल कुलकर्णीने हे पाऊल उचलल्याचे दिसून येतं आहे.

“काश्मीर आमचं आहे. आम्ही येणारच…”

तसेच काश्मीरला पोहोचल्यावर TV9 मराठीसोबत बोलताना त्यांनी म्हटंल की,” त्यांनी पर्यटकांवर हल्ला करून काश्मीरला येऊ नका म्हटलं काश्मीर आमचं आहे इथे प्रत्येक देशवासीय येणार हे सांगायला मी आलो आहे. तुम्ही (दहशतवादी) कोण सांगणारे? आम्ही इथं येऊ नको म्हणून , तुम्ही आम्हाला धमक्या देऊ नका… आम्ही येणारच. माझं कुठलंही शूटिंग इथं नाही. मला कुठल्याही ट्रॅव्हल कंपनीने किंवा हॉटेल्सने पैसे देऊन बोलावलं नाही. काश्मीरमध्ये देशभरातून आलेले पर्यटक एकमेकांशी जोडले जातात, म्हणूनच हा हल्ला करून तुम्ही येऊ नका हा संदेश देण्यात आला. पण आपल्याला त्यांना आपल्या कृतीतून आणि विचारांतून हरवावंच लागेल” असं म्हणत अभिनेत्याने सर्वांना एक हिंमत देण्याचा प्रयत्न केला आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरला जायला लोक घाबरत असताना त्यांनी काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्वच थक्क झालेत. त्यांच्या या निर्णयाची चर्चा सर्वत्र होत असून त्यांच्या धाडसाचे कौतुकही केलं जात आहे.

गोवंडीत डंपरनं चिरडून तिघांचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून ठिय्या
गोवंडीत डंपरनं चिरडून तिघांचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून ठिय्या.
6 व्या दिवशी उपोषण सोडलं, बच्चू कडूंना सरकारकडून आश्वासनांचं पत्र
6 व्या दिवशी उपोषण सोडलं, बच्चू कडूंना सरकारकडून आश्वासनांचं पत्र.
मेडे, मेडे... पायलटचा असा होता शेवटचा मेसेज, Mayday म्हणजे नेमकं काय?
मेडे, मेडे... पायलटचा असा होता शेवटचा मेसेज, Mayday म्हणजे नेमकं काय?.
..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं
..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं.
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?.
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर...
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय.
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी.
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.