AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Vidyarthi | आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत; म्हणाल्या ‘तुम्हाला दु:ख..’

अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न केलं. त्यांच्या या दुसऱ्या लग्नानंतर त्यांची पहिली पत्नी राजोशी बरुआ यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टची चर्चा होत आहे. त्यांना मानसिक धक्का बसल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

Ashish Vidyarthi | आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत; म्हणाल्या 'तुम्हाला दु:ख..'
Ashish Vidyarthi's first and second wifeImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 27, 2024 | 10:37 PM
Share

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. फॅशन उद्योजक रुपाली बरुआ यांच्याशी त्यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आशिष यांच्या दुसऱ्या लग्नानंतर त्यांची पहिली पत्नी राजोशी बरुआ यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. इन्स्टाग्रामवर त्यांनी असे काही पोस्ट शेअर केले आहेत, ज्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

गेल्या 17-18 तासांमध्ये राजोशी यांनी इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केले आहेत. आपण ज्या व्यक्तीला योग्य व्यक्ती समजतो, तीच व्यक्ती जेव्हा आपलं मन दुखावते, अशा आशयाची त्यांची पहिली पोस्ट आहे. “समोरच्या व्यक्तीसाठी तुमचं महत्त्व काय आहे, असा प्रश्न योग्य व्यक्ती कधीच उपस्थित होऊ देत नाही. ज्या गोष्टींमुळे तुम्हाला दु:ख होतं अशा गोष्टी ते करत नाहीत. लक्षात ठेवा”, अशी त्यांची पहिली पोस्ट होती.

दुसऱ्या पोस्टमध्ये त्या मनाच्या शांतीबद्दल बोलताना दिसत आहेत. ‘तुमच्या मनातील अतिविचार आणि शंका लगेचच दूर जाऊ दे. संभ्रमाची जागा स्पष्टताने घेऊ दे. तुमचं आयुष्य शांततेने परिपूर्ण होऊ दे. बराच काळ तुम्ही धैर्याने राहण्याचा प्रयत्न केला, पण आता चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याची वेळ झाली आहे. त्यावर तुमचा हक्क आहे’, असं त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

राजोशी यांनी त्यांच्या शेवटच्या पोस्टमध्ये स्वत:चा एक सेल्फी पोस्ट केला आणि लिहिलं, ‘आयुष्याच्या कोड्यात स्वत: एक कोडं बनून राहू नका.’ राजोशी यांच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्यांना त्यांच्या घटस्फोटाविषयी प्रश्न विचारला आहे. राजोशी या ज्येष्ठ बंगाली अभिनेत्री शकुंतला बरुआ यांच्या कन्या आहेत. आशिष आणि राजोशी यांचं 1990 मध्ये लग्न झालं होतं. आशिष विद्यार्थी अँड असोसिएशनच्या त्या सहसंस्थापकसुद्धा आहेत. आशिष आणि राजोशी यांना 23 वर्षांचा मुलगा असून त्याचं नाव अर्थ विद्यार्थी असं आहे.

आशिष यांची दुसरी पत्नी रुपाली या गुवाहाटीच्या असून उद्योजिका आहेत. कोलकातामधील फॅशन इंडस्ट्रीत त्यांचं मोठं नाव आहे. एका फॅशन शूटदरम्यान या दोघांची पहिली भेट झाली होती. शूटनंतर दोघांनी एकमेकांकडून मोबाइल नंबर घेतला आणि त्यांचा संपर्क सुरू झाला. चांगली मैत्री झाल्यानंतर आशिष आणि रुपाली हे एकमेकांना डेट करू लागले होते. काही वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी अखेर 25 मे रोजी लग्नगाठ बांधली.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.