AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक-नताशानंतर बॉलिवूडचं हे कपल आता वेगळे होणार असल्याची चर्चा

हार्दिक आणि नताशा यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. अखेर दोघांनी गुरुवारी याची घोषणा केली. दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. याची चर्चा सुरु असतानाच आणखी एक कपल वेगळं होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कोण आहे ते कपल जाणून घ्या.

हार्दिक-नताशानंतर बॉलिवूडचं हे कपल आता वेगळे होणार असल्याची चर्चा
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jul 19, 2024 | 5:04 PM
Share

हार्दिक आणि नताशा यांनी अखेर विभक्त झाल्याचं जाहीर केलं आहे. दोघांनी एक ज्वॉईंट स्टेटमंट शेअर करत याबाबत सगळ्यांना माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर ती गोष्ट खरी ठरली आहे. दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय. हार्दिक आणि नताशा यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. दोघांना एक मुलगा आहे. त्यामुळे मुलाबद्दल सगळे चिंता व्यक्त करत आहेत. घटस्फोटाची घोषणा करण्यापूर्वीत नताशा देश सोडून आपल्या घरी परतली आहे. नताशा ही सर्बियाची नागरिक आहे. त्यामुळे आता ती आपल्या देशात परतली आहे.

दोघांच्या विभक्त होण्याच्या बातम्या येत असतानाच आता बॉलिवूडचं आणखी एक कपल देखील चर्चेत आलं आहे. अर्जुन कपूर आणि मलायका हे देखील विभक्त झाल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर लोकं दोघांच्या नात्याबद्दल चर्चा करत आहेत. अर्जुन कपूर आणि मलायका गेले अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होते. पण आता दोघेही विभक्त झाल्याची चर्चा आहे.

अर्जुनची पोस्ट व्हायरल

अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, पॉझिटिव्ह असण्याचा अर्थ गोष्टी सुरळीत होतील असा नाही तर याचा अर्थ असा आहे की गोष्टी कशाही असोत, तुम्ही ठीक आहेत. टर्न आऊट… अर्जुनची ही पोस्ट समोर येताच दोघांच्या रिलेशनशिपमध्ये काहीही सुरळीत नसल्याचं बोललं जात आहे. दोघेही एकमेकांना डेट करत आहेत, मात्र काही काळापासून त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवांनी बाजार तापला आहे.

मलायका स्पेनला गेली होती. तेथून ती नुकतीच परतली आहे. ती मुलासोबत विमानतळावर दिसली, मात्र अर्जुनच्या या पोस्टमुळे या जोडप्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. सध्या लोकांना हार्दिक आणि नताशाच्या विभक्त होण्यावर विश्वास बसत नाही. त्यातच अर्जुनने पुन्हा अशी पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.

अर्जुनने काल देखील अशीच एक पोस्ट शेअर केली होती. मलायकाने तिच्या स्पेनमधील सुट्टीचे फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये एर मिस्ट्री मॅन दिसला होता. तो कोण आहे याबाबत आता चर्चा सुरु आहेत.

मलायकाच्या फोटोत ‘मिस्ट्री मॅन’ची झलक दिसताच अर्जुन आणि मलायकाच्या विभक्त होण्याची चर्चा सुरु झाली. अर्जुन किंवा मलायका या दोघांनीही या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दोघांनीही या अफवांवर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. आता दोघेही एकत्र आहेत की नाही हे येणारा काळच सांगेल. मात्र सध्या तरी ते वेगळे होणार असल्याची चर्चा आहे.

Follow Us
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?