AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदर्श कुटुंब कसं असावं? समंथाच्या पूर्व पतीने मांडलेलं मत चर्चेत

दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांनी ऑगस्ट महिन्यात साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. या साखरपुड्याचे फोटो अवघ्या काही क्षणांत सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता डिसेंबर महिन्यात हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.

आदर्श कुटुंब कसं असावं? समंथाच्या पूर्व पतीने मांडलेलं मत चर्चेत
Sobhita Dhulipala and Naga ChaitanyaImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 17, 2024 | 8:25 AM
Share

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य आणि अभिनेत्री सोभिता धुलिपाला लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा पार पडला. नाग चैतन्यचं हे दुसरं लग्न असून याआधी त्याने अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्यचं नाव सोभिताशी जोडलं गेलं होतं. आता नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत नाग चैतन्य त्याच्या दुसऱ्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. “तुझ्या मते आदर्श कुटुंब कसं असेल”, असा प्रश्न त्याला या मुलाखतीत विचारण्यात आला. नाग चैतन्यनने अभिनेता राणा डग्गुबत्तीच्या ‘द राणा डग्गुबत्ती शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी विविध विषयांवर गप्पा मारल्या. सोशल मीडियावर या एपिसोडचा प्रोमो व्हायरल होत आहे.

नाग चैतन्यला राणा विचारतो, “तुझं कुटुंब कसं असेल, याबद्दल तुझी काय कल्पना आहे?” त्यावर उत्तर देताना नाग चैतन्य म्हणतो, “सुखी वैवाहिक आयुष्य आणि काही मुलं.” हे ऐकल्यानंतर राणा मस्करीत त्याला म्हणतो, “काही मुलं म्हणजे वेंकी काकांसारखी चार की दोन मुलं?” त्यावर नाग चैतन्य हसत सांगतो, “वेंकी काकांसारखी नकोत.” वेंकी काका म्हणजेच दाक्षिणात्य अभिनेते व्यंकटेश. ते राणा आणि नाग चैतन्य यांचे काका असून त्यांना चार मुलं आहेत.

‘द राणा डग्गबत्ती शो’ येत्या 23 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पहिल्या सिझनमध्ये आठ एपिसोड्स पहायला मिळतील. प्रत्येक शनिवारी एक एपिसोड प्रसारित होईल. राणाच्या या टॉक शोमध्ये आतापर्यंत अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी हजेरी लावली होती. यात नाग चैतन्यशिवाय दलकर सलमान, एस. एस. राजामौली, नानी, राम गोपाल वर्मा, श्रीलीला, ऋषभ शेट्टी, तेजा सज्जा यांचा समावेश आहे. इतकंच नव्हे तर एका एपिसोडमध्ये राणाची पत्नी मिहीकासुद्धा पाहुणी म्हणून उपस्थित राहील.

याआधी दिलेल्या एका मुलाखतीत सोभितासुद्धा आई होण्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती. “साखरपुड्याबाबत माझ्या फारशा अपेक्षा किंवा स्वप्न नव्हती. मला फक्त त्या क्षणांचा आनंद घ्यायचा होता. तो अनुभव अत्यंत साधा आणि तितकाच खास होता. मी जसा विचार केला होता तसंच सगळं पार पडलं होतं. जेव्हा गोष्टीच इतक्या सुंदर घडत असतील, तेव्हा त्यात आणखी काही भरजरीची गरज नसते. ते क्षण तुमच्यासाठी पुरेसे ठरतात. ते सर्वकाही परफेक्ट होतं. मातृत्वाचा अनुभव घेण्याबद्दल मी नेहमीच सकारात्मक होते. याबाबतीत मी खूप स्पष्ट आहे. लग्नाबाबतही मी नेहमीच सकारात्मक होती”, असं ती म्हणाली.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.