AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जया बच्चन यांनी चित्रपटाची खिल्ली उडवल्यानंतर अक्षय थेट म्हणाला, “कोणी मूर्खच असं..”

टॉयलेट: एक प्रेम कथा हे काही नाव आहे का? असं शीर्षक असतं का? असा सवाल करत ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी अक्षय कुमारच्या चित्रपटाची खिल्ली उडवली होती. त्यावर आता अक्षय कुमारने प्रतिक्रिया दिली आहे.

जया बच्चन यांनी चित्रपटाची खिल्ली उडवल्यानंतर अक्षय थेट म्हणाला, कोणी मूर्खच असं..
Akshay Kumar and Jaya BachchanImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 11, 2025 | 2:55 PM
Share

अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. उघड्यावर शौचालयाला जाण्याच्या समस्येवर आणि घरोघरी शौचालय बांधण्याविषयीच्या जागरुकतेवर भाष्य करणारा हा चित्रपट होता. सामाजिक संदेश देणाऱ्या या चित्रपटाचं अनेकांकडून कौतुक झालं होतं. परंतु ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना मात्र चित्रपटाच्या नावातंच समस्या जाणवली होती. “आता तुम्ही नावंच पहा कसं आहे, मी स्वत: असा चित्रपट कधी पहायला जाणार नाही. टॉयलेट: एक प्रेम कथा हे काही नाव आहे का? असं शीर्षक असतं का,” असं म्हणत त्यांनी अक्षयच्या चित्रपटाची खिल्ली उडवली होती. त्यावर आता अक्षयने प्रतिक्रिया दिली आहे.

‘केसरी 2’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अक्षयला त्याच्या चित्रपटां निवडीवरून होणाऱ्या ट्रोलिंगविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “मला वाटत नाही की कोणी त्यावर टीका करत असेल. अशा चित्रपटांवर टीका करणारा कोणीतरी मूर्खच असेल. पॅडमॅन, टॉयलेट: एक प्रेम कथा, एअरलिफ्ट, केसरी यांसारखे बरेच चांगले चित्रपट मी केले आहेत. त्यामुळे अशा चित्रपटांवर टीका करणारी व्यक्ती मूर्खच असेल. मी अत्यंत मनापासून हे चित्रपट बनवले आहेत. या चित्रपटांमधून लोकांना बरेच संदेश मिळतात, बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या जातात.” अक्षयच्या या उत्तरानंतर त्याला जया बच्चन यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली. त्यावर तो पुढे म्हणतो, “आता तर त्यांनी असं म्हटलं असेल तर योग्य असेल, मला माहीत नाही. असे चित्रपट बनवून जर मी काही चुकीचं काम केलं असेन, असं त्यांचं म्हणणं असेल तर त्या ठीकच म्हणत असतील.”

काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

इंडिया टीव्हीच्या कॉन्क्लेव्हमध्ये जया बच्चन यांना ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या सरकारी मोहिमेवरील आधारित चित्रपटाबाबतत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या होत्या, “आता तुम्ही नावंच पहा कसं आहे, मी स्वत: असा चित्रपट कधी पहायला जाणार नाही. टॉयलेट: एक प्रेम कथा हे काही नाव आहे का? असं शीर्षक असतं का?” इतकंच नव्हे तर त्यांनी अक्षय कुमारच्या या चित्रपटाला फ्लॉप असंही म्हटलं होतं. असं विचित्र शीर्षक असलेला चित्रपट तुम्ही पहायला जाणार का, असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला होता. त्यानंतर प्रेक्षकांमधून काहींनी हात उंचावल्यावर जया म्हणाल्या, “इतक्या लोकांमधून फक्त चार जणांना हा चित्रपट पाहावासा वाटतोय. हे खूप दु:खद आहे. हा तर फ्लॉप चित्रपट आहे.”

Follow Us
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका
चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात जालन्यात मुंडन आंदोलन
जालन्यात भीमशक्ती संघटनेचे मुंडन आंदोलन
मनोज जरांगेंकडून आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रिया, थेट पोलिसांना अर्ज अन
मनोज जरांगेंकडून आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रिया, थेट पोलिसांना अर्ज अन् आझाद मैदानावर...
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम...
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम सरोदंचं मोठं विधान, काय म्हणाले?