AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Assembly Election 2026 : ‘हे पलायन नाही, एक शांत निरोप’, ममता बॅनर्जी यांच्या राजवटीवर प्रसिद्ध अभिनेत्रीने बोलून दाखवलं मनातलं दु:ख

West Bengal Assembly Election 2026 :पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत. काल लोकांनी भरभरुन मतदान केलं. त्याचवेळी पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हिंसाचारही पहायला मिळाला. एका प्रसिद्धी अभिनेत्रीने पश्चिम बंगालमधल्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

West Bengal Assembly Election 2026 : 'हे पलायन नाही, एक शांत निरोप', ममता बॅनर्जी यांच्या राजवटीवर प्रसिद्ध अभिनेत्रीने बोलून दाखवलं मनातलं दु:ख
Tv Actress puja banerjee
| Updated on: Apr 24, 2026 | 8:18 AM
Share

पश्चिम बंगालमध्ये काल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान झालं. त्याआधी 22 एप्रिलला टीव्ही अभिनेत्री पुजा बॅनर्जीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. यात पश्चिम बंगालमधून दररोज सुरु असलेल्या पलायनावर तिने भाष्य केलं. बंगालमध्ये युवांना आधार देणाऱ्या इंडस्ट्रीजची कमतरता आहे असं तिने म्हटलं. “बंगालचे युवा आपल्या मर्जीने बंगाल सोडत नाहीयत. हे पलायन नाही, नाईलाज आहे. दरदिवशी हजारो लोक निघून जातात. त्यांना मनापासून निघून जायचं आहे, असं नाहीय. सत्य खूप सरळ आहे. लोक तिथेच राहतात, जिथे संधी असते. जिथे संधी नसते, तिथून निघून जातात. कॅपिटल फॉर्मेशन 6.7 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांपेक्षा पण खाली आलं आहे. हे आकडा फक्त डाटा नाही, तर कारखाने बनवतो” असं पूजा बॅनर्जीने म्हटलं आहे.

“दुसरी शहरं वाढतायत, पसरतायत, काही नवीन बनवतायत. म्हणून लोक तिथे जातात. तुम्ही एका पिढीला किती वाट पहायला सांगणार आहात?. तुम्ही त्यांना कधीपर्यंत तडजोड करायला सागंणार?. इथून निघून जाणं हा एकमात्र पर्याय कधीपर्यंत राहणार?. आम्ही खूप शिकलो, तर इथेच आम्हाला नोकरी मिळणार हे ऐकत आम्ही मोठे झालो आहोत. पण कुठे ना कुठे असं होत नाहीय” बंगालच्या परिस्थितीवर असं परखड भाष्य पूजा बॅनर्जीने केलय.

हे पलायन नाही, एक शांत निरोप

“जास्त डिग्री, जास्त ग्रॅज्युएट्स, पण त्या हिशोबाने पुरेशा नोकऱ्या नाहीत. ही तीच भूमी आहे, ज्यांनी रवींद्रनाथ टागोर, सुभाष चंद्र बोस, सत्यजीत रे सारखे लोक दिले. टॅलेंट कधी समस्या नव्हती. आम्हाला इथे स्वप्न बघायला शिकवलं, फक्त इथे भारतात ती स्वप्न पूर्ण होताना दिसत नाहीत. आम्ही जिथे कुठे जाऊ, तिथे बंगालला सोबत घेऊन जाऊ. पण आमच्यावर इथून जाण्याची वेळ येऊ नये. हे पलायन नाही, एक शांत निरोप आहे” असं पूजा बॅनर्जीने म्हटलय.

पश्चिम बंगाल निवडणुकीचे निकाल कधी?

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. काल 23 एप्रिलला पहिल्या टप्प्यासाठी मतदान झालं. 29 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. 4 मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि भाजपमध्ये सामना आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप