AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan | ‘जलसा’ बंगल्याबाहेर भेटायला येणाऱ्या चाहत्यांना बिग बींनी दिली ‘वॉर्निंग’!

गेल्या काही दिवसांपासून बिग बी हे त्यांच्या आगामी 'सेक्शन 84' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. हा कोर्ट रुम ड्रामा असणार आहे. काही दिवसांपूर्वी 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना मोठी दुखापत झाली होती.

Amitabh Bachchan | 'जलसा' बंगल्याबाहेर भेटायला येणाऱ्या चाहत्यांना बिग बींनी दिली 'वॉर्निंग'!
Amitabh BachchanImage Credit source: Twitter
| Updated on: May 07, 2023 | 4:37 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नेहमीच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असतात. कधी ब्लॉगद्वारे तर कधी ट्विट करत ते चाहत्यांना स्वत:विषयी अपडेट देत असतात. याशिवाय बिग बी दर रविवारी त्यांच्या ‘जलसा’ या बंगल्याबाहेर जमलेल्या चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र नुकत्याच लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये त्यांना येत्या रविवारी चाहत्यांना बंगल्याबाहेर न येण्याची विनंती केली आहे. यामागचं कारणसुद्धा त्यांनी लिहिलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की येत्या रविवारी त्यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर गर्दी करू नका. कारण ते त्यांच्या चाहत्यांची भेट घेऊ शकणार नाहीत. शनिवारी रात्री त्यांनी हा ब्लॉग लिहिला आहे. ‘मी जलसाच्या गेटवर येऊ शकणार नाही. कारण मला काही काम आहे, जे पूर्ण करण्यासाठी मी रविवारचा दिवस निश्चित केला आहे. मी संध्याकाळी 5.45 पर्यंत परत येण्याचा प्रयत्न करेन. मात्र उशिरसुद्धा होऊ शकतो. म्हणून मी आधीच तुम्हाला कळवत आहे की कृपया गेटवर येऊ नका’, असं त्यांनी म्हटलंय.

गेल्या काही दिवसांपासून बिग बी हे त्यांच्या आगामी ‘सेक्शन 84’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. हा कोर्ट रुम ड्रामा असणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना मोठी दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर ते बराच काळ घरी आराम करत होते. मात्र ब्लॉगद्वारे ते चाहत्यांना वेळोवेळी आपल्या तब्येतीचे अपडेट्स देत होते.

बरेच दिवसांनंतर ते निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांच्या अंत्यविधीला माध्यमांसमोर आले. पामेला यांच्या निधनानंतर त्यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली होती. ‘त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला होता. चित्रपट निर्मिती, संगीतांच्या बैठका, घरातील आणि घराबाहेरील गेट टुगेदर.. सर्वकाही एका क्षणात निघून गेलं. एक एक करून सर्वजण सोडून जात आहेत. आपल्यामागे ते एकत्र घालवलेले सुंदर क्षण सोडून गेले आहेत’, असं बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं. अमिताभ बच्चन हे मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासह पामेला यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले होते. आयुष्य खूप कठीण आणि अंदाज न लावता येण्यासारखं आहे, असंही बिग बी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हणाले होते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.