AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानींच्या लग्नानंतर अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट; म्हणाले, ‘त्यांच्या चेहऱ्यांमध्ये झालेले बदल…’

Amitabh Bachchan Post: अंबानींच्या लग्नात सून आणि नातीसोबत नाही दिसलं बच्चन कुटुंब, लग्नातूननंतर अमिताभ बच्चन म्हणाले, 'त्यांच्या चेहऱ्यांमध्ये झालेले बदल...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चा..

अंबानींच्या लग्नानंतर अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट; म्हणाले, 'त्यांच्या चेहऱ्यांमध्ये झालेले बदल...'
| Updated on: Jul 13, 2024 | 2:25 PM
Share

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन संपूर्ण कुटुंबासोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात सामिल झाले होते. बिग बी यांनी नात नव्या नंदा आणि नातू अगस्त्य नंदा यांच्यासोबत पोज दिल्या. पण बच्चन कुटुंब ऐश्वर्या आणि आराध्या यांच्यासोबत दिसलं नाही. आराध्या आणि ऐश्वर्या कुटुंबाशिवाय अंबानींच्या लग्नात सामिल झाल्या होत्या. लग्नानंतर अमिताभ बच्चन यांनी एक लक्षवेधी पोस्ट केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

अमिताभ बच्चन यांनी पहाटे 4 च्या दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अंबानींच्या लग्नाचा अनुभव शेअर करत बिग बी म्हणाले, ‘ या अलौकिक काळातही जोडण्याची इच्छा आणि इच्छा काहींसाठी… अनेकांसाठी ही कामाची वेळ आहे… परंतु माझ्यासाठी मला EF कनेक्टसाठी वेळ वापरावा लागेल. अनेक दिवसांनंतर अनेकांची झालेली भेट, प्रेम आणि स्नेह… ज्यामुळे जुन्या नात्यांचा पुन्हा विचार करू शकतो…’

‘असं वाटत आहे की, त्यांच्या चेहऱ्यांमध्ये आता बदल झाले आहेत. पण आमच्यात आसलेलं प्रेमळ नाते आजही खूप प्रामाणिक आहेत. यालाच जीवन असं म्हणतात. याच छोट्या – छोट्या गोष्टी एकमेकांसाठी फार महत्त्वाच्या असतात.’ असं देखील बिग बी म्हणाले. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, अंबानींच्या कोणत्याही कार्यक्रमात बच्चन कुटुंब मोठ्या आनंदाने हजेरी लावतात. अंबानी आणि बच्चन कुटुंबाचे नाते देखील फार खास आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी, मुलगी ईशा अंबानी यांच्या लग्नात देखील बच्चन कुटुंब उपस्थित होतं.

अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांचं लग्न 

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांनी लग्नाचा निर्णय घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा होती.  दोघांच्या प्री-वेडींग सेलिब्रेशनसाठी देखील बच्चन कुटुंब जामनगर याठिकाणी पोहोचलं होतं. तेव्हा आराध्या हिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सध्या सर्वत्र फक्त अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांचं लग्न आणि अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ