AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनगणनेच्या फॉर्ममध्ये अमिताभ बच्चन जात का लिहित नाहीत? उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट

अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती 15'च्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये शाळेतला मजेशीर किस्सा सांगितला. आपल्याला बच्चन हे आडनाव कसं मिळालं याविषयीचा हा किस्सा होता. त्याचसोबत जनगणनेच्या फॉर्ममध्ये जात कोणती लिहितात, याबद्दलही ते व्यक्त झाले.

जनगणनेच्या फॉर्ममध्ये अमिताभ बच्चन जात का लिहित नाहीत? उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट
| Updated on: Sep 23, 2023 | 9:41 PM
Share

मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : ‘कौन बनेगा करोडपती 15’च्या 26 व्या एपिसोडमध्ये सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी मधुरिमा यांचं हॉटसीटवर स्वागत केलं. त्यांची ओळख करून देताना बिग बी म्हणाले, “मधुरिमा या झारखंडमधल्या रांची इथल्या आहेत. त्या वन, पर्यावरण आणि हवामान बदल विभागात विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मधुरिमा तुमचं पूर्ण नाव काय आहे?” त्यावर उत्तर देताना मधुरिमा म्हणतात, “सर, माझं नाव मधुरिमा आहे. मला माझं नाव फक्त मधुरिमा असंच सांगायचं आहे. सर्वसाधारणपणे वडिलांचं नाव हे आडनाव असतं. लग्नानंतर पतीचं आडनाव आम्हाला जोडलं जातं. किंवा महिलेच्या नावाला ‘देवी’ असा प्रत्यय लावला जातो. मात्र तुम्हाला देवीसारखा आदर मिळत नाही. म्हणून मी आडनावाशी सहमत नाही. मला लग्न झाल्यानंतर पतीने त्यांचं आडनाव जोडणार का असा प्रश्न विचारला. त्यावर मी त्यांना म्हणाले की, माझं नावंच पुरेसं आहे. मला इतर कोणत्याही आडनावाची गरज नाही.”

मधुरिमा यांचं म्हणणं ऐकल्यानंतर बिग बी हसले आणि म्हणाले, “हे खरंच खूप छान आहे. तुमची मतं खूप चांगली आहेत. तुम्ही सांगितलेल्या या परंपरेबद्दल मी तुमचं अभिनंदन करू इच्छितो. मीसुद्धा माझ्या नावाबद्दल असंच काहीसं केलं आहे. माझे वडील हरिवंशराय बच्चन हे जातीव्यवस्थेची बाजू घेणारे नव्हते.” याविषयी पुढे बोलताना बच्चन आडनावामागील रंजक किस्सा ते सांगतात.

“भारतात एखाद्या व्यक्तीच्या आडनावावरून त्याच्या जातीचा अंदाज लावला जातो. माझे वडील कायस्थ कुटुंबातील होते. त्यांनी कवी म्हणून टोपणनाव बच्चन असं ठेवलं आणि नंतर तेच त्यांचं आडनाव बनलं. मी मोठा झाल्यानंतर मला शाळेत दाखल करायचं होतं. तेव्हा माझ्या पालकांना माझं आडनाव विचारण्यात आलं होतं. तेव्हा माझ्या आईवडिलांनी एकमेकांकडे पाहिलं आणि काय करायचं असा इशारा केला. नंतर आई वडिलांना म्हणाली, त्याने तुमचंच आडनाव लावलं पाहिजे. अशा प्रकारे मी अमिताभ बच्चन झालो. ही गोष्ट माझ्या वडिलांच्या आत्मचरित्रातही लिहिली आहे”, असं बिग बींनी सांगितलं.

अमिताभ बच्चन पुढे म्हणतात, “मधुरिमा, तुमचे विचार फार कौतुकास्पद आहेत. एखाद्याच्या आडनावावरून आणि जातीवरून प्रश्न उपस्थित केले जातात.” त्यावर मधुरिमा उत्तर देत म्हणतात, “मी तुमच्याशी सहमत आहे सर. लोक विविध गट बनवतात. कामाच्या ठिकाणीही त्यावरून गटबाजी होते.”

बिग बी पुढे म्हणाले, “तुम्हाल जनगणनेविषयी माहिती असेल. लोकांची नावं, वय, उंची, वजन यांची लांबलचक यादी असते. त्यात जातीसाठी एक वेगळा विभाग असतो. मी ते भरलं नव्हतं म्हणून मला माझ्या जातीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मी भारतीय असल्याचं सांगितलं. त्यावर ते म्हणाले की नाही सर, तुम्हाला तुमची जात नमूद करावी लागेल. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी करणार नाही. मला जात नाही. मी भारतीय आहे. आता जर त्यांनी पुन्हा मला त्यावरून प्रश्न विचारला तर मी इतकंच म्हणेन की, मी भारतीय आहे आणि आपलं चांद्रयान चंद्रावर पोहोचलं आहे.” हे ऐकल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.