AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC 15 | अचूक उत्तर माहीत असतानाही 7 कोटी रुपयांवर फेरलं पाणी; ‘केबीसी’ला मिळाला दुसरा विजेता

कौन बनेगा करोडपतीच्या पंधराव्या सिझनला दुसरा करोडपती भेटला आहे. जसनिल कुमारने एक कोटी रुपये आपल्या नावे केले आहे. मात्र सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचं अचूक उत्तर माहीत असतानाही त्याने शो सोडण्याचा निर्णय घेतला.

KBC 15 | अचूक उत्तर माहीत असतानाही 7 कोटी रुपयांवर फेरलं पाणी; 'केबीसी'ला मिळाला दुसरा विजेता
KBC 15 Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 23, 2023 | 9:19 AM
Share

मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : कौन बनेगा करोडपतीचा पंधरावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. या सिझनचा दुसरा करोडपती नुकताच भेटला आहे. याआधी पंजाबच्या जसकरणने एक कोटी रुपये जिंकले होते. त्यानंतर आता उत्तरप्रदेशच्या जसनिल कुमारने एक कोटी रुपये आपल्या नावे केले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये जसनिलने एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचं योग्य उत्तर देत धनराशी जिंकली आहे. मात्र जेव्हा सात कोटी रुपयांसाठीचा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने खेळ तिथेच थांबवला. मात्र खेळ सोडल्यानंतर सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी जेव्हा त्याला उत्तराबद्दल अंदाज व्यक्त करण्यास सांगितलं. तेव्हा जसनिलने दिलेलं उत्तर योग्य ठरलं होतं.

एक कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न

प्रश्न- ‘कोणाद्वारे केलेल्या यज्ञानंतर उरलेल्या सोन्याचा उपयोग पांडवांनी आपल्या राजकोषाला पुन्हा एकदा भरण्यासाठी आणि अश्वमेध यज्ञ आयोजित करण्यासाठी केला होता?’ पर्याय- A- विकर्ण, B- मरुत्त, C- कुबेर, D- लिखित. या प्रश्नाचं अचूक उत्तर मरुत्त असं होतं आणि हे उत्तर देऊन जसनिलने एक कोटी रुपये जिंकले. त्यानंतर पुढे त्याला सात कोटी रुपयांचा प्रश्न विचारला जातो.

7 कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न

प्रश्न- भारतीय मूळची असलेली लीना गाडे ही यापैकी कोणती शर्यत जिंकणारी पहिली महिला रेस इंजीनिअर आहे? पर्याय- A- इंडिआनापोलीस 500, B- 24 अवर्स ऑफ ल मॉ, C- 12 अवर्, ऑफ सेब्रिंग, D- मोनॅको ग्रँड प्री.

या प्रश्नाचं अचूक उत्तर हे ऑप्शन ‘बी’ होतं. मात्र त्या उत्तराबद्दल खात्री नसल्याने जसनिलने शो सोडत एक कोटी रुपये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. याआधी पंजाबच्या जसकरणनेही एक कोटी रुपये जिंकल्यानंतर शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. पद्मपुराणानुसार, कोणत्या राजाला एका हरिणीच्या शापामुळे शंभर वर्षांपर्यंत वाघ बनून राहावं लागलं होतं, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे चार पर्याय – A- क्षेमधूर्ती B- धर्मदत्त C- मितध्वज D- प्रभंजन असे होते. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं ऑप्शन D- प्रभंजन. मात्र हे उत्तर माहीत नसल्याने जसकरण सात कोटी रुपये जिंकू शकला नाही.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.