AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोगॅम्बोच्या भूमिकेसाठी अमरीश पुरी नाही तर हा अभिनेता होता पहिली पसंती; अनिल कपूरमुळे गमावली भूमिका

'मिस्टर इंडिया' चित्रपट आजही तेवढाच लोकप्रिय आहे. मोगॅम्बोच्या भूमिकेतील अमरीश पुरीही सर्वांना फार आवडले. पण या भूमिकेसाठी अमरीश पुरी नाही तर एक सुप्रसिद्ध अभिनेता पहिली पसंती होता. मात्र अनिल कपूरने स्वत:च आपल्या मित्राची ही भूमिका काढून घेतली आणि त्यामुळे ही भूमिका अमरीश पुरी यांना देण्यात आली.

मोगॅम्बोच्या भूमिकेसाठी अमरीश पुरी नाही तर हा अभिनेता होता पहिली पसंती; अनिल कपूरमुळे गमावली भूमिका
Anupam Kher Mr. IndiaImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 08, 2025 | 5:30 PM
Share

1987मध्ये प्रदर्शित झालेल्या अनिल कपूर, श्रीदेवी आणि अमरीश पुरी यांच्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपट आजही तेवढाच लोकप्रिय आहे. त्यातील गाणी आणि डायलॉगही तेवढेच प्रसिद्ध आहेत. या चित्रपटातील एक डायलॉग म्हणजे ‘मोगॅम्बो खुश हुआ…’ हा प्रसिद्ध संवाद चाहत्यांना खूप आवडला आणि आजही तो तेवढाच लोकप्रिय आहे. पण हे फास कमी जणांना माहित असेल की मोगॅम्बोच्या भूमिकेसाठी अमरीश पुरी नाही तर दुसऱ्याच एका अभिनेता पहिली पसंती होता. मात्र अनिल कपूरने स्वत:च आपल्या मित्राची ही भूमिका काढून घेतली आणि त्यामुळे ही भूमिका अमरीश पुरी यांना देण्यात आली.

हा अभिनेता साकारणार होता मोगॅम्बोची भूमिका

मिस्टर इंडिया चित्रपटातील मोगॅम्बोची खलनायकाची भूमिका अमरीश पुरी यांनी साकारली होती. चाहत्यांना ही भूमिका इतकी आवडली की आजही ती त्यांच्या मनात कोरली आहे. खरंतर, अमरीश पुरींची मोगॅम्बोची ही भूमिका पहिल्यांदा अनुपम खेर यांना ऑफर करण्यात आली होती. टीव्ही चॅट शो ‘कुछ भी हो सकता है’ मध्ये सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान अनुपम खेर यांनी याचा खुलासा केला होता. ते म्हणाले की, “मिस्टर इंडिया चित्रपटातील खलनायक ‘मोगॅम्बो’ची भूमिका पहिल्यांदा मला ऑफर करण्यात आली होती.

भूमिका काढून घेण्यात आली

मात्र एक-दोन महिन्यांनी अनुपम खेर यांना या भूमिकेतून काढून टाकण्यात आले. चित्रपटात अनुपम खेर यांच्याऐवजी अमरीश पुरी यांना ही भूमिका देण्यात आली. तथापि, अनुपम खेर यांनी सांगितले की त्यांना याचा अजिबात पश्चात्ताप नाही कारण ही भूमिका साकारणारा अभिनेता अमरीश पुरी यांनी मिस्टर इंडियामध्ये अद्भुत अभिनय केला होता. यासोबतच त्यांनी असेही सांगितले की चित्रपटात त्यांच्याकडून ही भूमिका काढून घेणारा दुसरा कोणी नसून त्यांचा जवळचा मित्र अनिल कपूर होता जो त्या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम करत होता.

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेर आणि अनिल कपूर यांची मैत्री

मिस्टर इंडिया चित्रपट त्या काळातील इतका मोठा हिट चित्रपट होता की तो हिंदीसह इतर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला. अनुपम खेर आणि अनिल कपूर यांच्या मैत्रीचे उदाहरण चित्रपटसृष्टीत दिले जाते. दोन्ही कलाकारांनी एकत्र अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अनुपम खेर, सतीश कौशिक आणि अनिल कपूर हे त्रिकूट बॉलीवूड जगतात खूप प्रसिद्ध होते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.