AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“असाच आहे आमचा रहमान”, हनिमूनच्या दिवशी पत्नीला एकटं सोडून निघून गेला; रहमानच्या भावाने सांगितला रहमानचा तो किस्सा

एआर रहमान आणि सायरा बानो यांच्या घटस्फोटाच्या बातमीनंतर त्यांचे अनेक जुने किस्से आणि मुलाखतींचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशातच आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एका मुलाखतीदरम्यान रहमानच्या भावाने रहमानचा हनीमूनचा एक किस्सा सांगितला आहे.

असाच आहे आमचा रहमान, हनिमूनच्या दिवशी पत्नीला एकटं सोडून निघून गेला; रहमानच्या भावाने सांगितला रहमानचा तो किस्सा
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Nov 24, 2024 | 6:35 PM
Share

एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी नुकतीच सोशल मीडियावर विभक्त होण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सोशल मीडियावर एआर रेहमानच्या खासगी आयुष्याविषयी चर्चा सुरू आहे.

एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी नुकतेच सोशल मीडियावर हे दोघे एकमेकांपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर दोघांचे वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या विभक्त होण्याबद्दल चर्चा करत आहेत. या दोघांनी आपला 29 वर्षांचे वैवाहिक नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर रहमान आणि त्याच्या पत्नीच्या जुन्या मुलाखती किंवा त्यात सांगितलेले त्यांचे किस्से आता व्हायरल होऊ लागले आहेत.

रहमानचा भावाने सांगितला त्याच्या हनिमूनचा किस्सा

काही दिवसांपूर्वी दोघांशी संबंधित रहमानच्या भावाने सांगितलेला एक व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रहमानच्या भावाने या दोघांच्या हनिमूनचा एक किस्सा सांगितला आहे.

रहमानच्या भावाने म्हटले होते की, ‘मला आठवतं आहे की, जेव्हा रहमानचे लग्न झाले, तेव्हा तो वहिनीला एका हिल स्टेशनवर हनिमूनला घेऊन गेला होता. त्या रात्री मी त्यांना फोन केला होता. रात्रीचे 12-1 वाजले असतील. सायरा वहिनीने माझा फोन उचलला आणि ती झोपेतच होती. मी तिला रहमान कुठे आहे, असे विचारलं. तर, त्यावर तिने उत्तर देताना म्हटलं की, मला माहित नाही. त्यावेळी रहमान दुसऱ्या खोलीत वीणा वादनाचा सराव करत होता. त्याच्या डोक्यात कधीही कोणतीही धून येऊ शकते. असाच आहे आमचा रहमान.’

हा किस्सा सांगत रहमानच्या भावाने रहमानसाठी त्याच्या आयुष्यात पहिल्या स्थानावर त्याचे म्यूजिक असल्याचे म्हटले.

#अरसायरा ब्रेकअप

दरम्यान एआर रहमानने घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली होती. त्यात असं म्हणण्यात आलं होतं की ‘आम्हाला वाटले होते की, आम्ही लग्नाची ३० वर्षे पूर्ण करू, परंतु आता सगळं संपलं आहे. देवाचे सिंहासनही तुटलेल्या हृदयाच्या ओझ्याखाली थरथरू शकते. तरीही, या कंपनात देखील आपण अर्थ शोध राहतो, मात्र तुकड्यांना त्यांची जागा पुन्हा मिळू शकत नाही. मित्रांनो, आम्ही या नाजूक परिस्थितून जात असताना तुम्ही दाखवलेल्या या दयाळूपणाबद्दल आणि आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद. #अरसायरा ब्रेकअप।’

या पोस्टमध्ये रहमानने त्यांच्या नात्याची एक दुसरी बाजूही सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.