AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटानंतरही मलायकाशी चांगलं नातं ठेवण्यावर अरबाज खानची प्रतिक्रिया; म्हणाला “मी जरी तिच्याशी बोलत असेन..”

अरबाज आणि मलायका यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना 20 वर्षीय अरहान हा मुलगा आहे. अरहान अमेरिकेत त्याचं शिक्षण पूर्ण करतोय. लग्नाच्या 18 वर्षांनंतर अरबाज आणि मलायकाने घटस्फोट घेतला.

घटस्फोटानंतरही मलायकाशी चांगलं नातं ठेवण्यावर अरबाज खानची प्रतिक्रिया; म्हणाला मी जरी तिच्याशी बोलत असेन..
Malaika Arora and Arbaaz KhanImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 20, 2023 | 8:04 AM
Share

मुंबई : अभिनेता अरबाज खान सध्या चित्रपटांमध्ये फारसा दिसत नसला तरी विविध कारणांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. अरबाज बऱ्याच मुलाखतींसाठी स्वतःचा वेळ आवर्जून काढतो. इतकंच नव्हे तर त्याचा स्वतःचा ‘द इनविंसिबल्स’ हा शो चांगलाच गाजला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाज त्याची पूर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोरविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. त्याचसोबत त्याने घटस्फोटानंतरही तिच्याशी संपर्क ठेवल्याबद्दल ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

मलायकासोबत चांगलं नातं ठेवल्यामुळे ट्रोलिंग होत असताना मनात काय भावना असते, असा प्रश्न त्याला विचारला गेला. त्यावर तो म्हणाला, “जग काय म्हणतंय याने मला फरक पडत नाही. लोक तर विविध प्रकारे बोलत असतात. प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर अशा लोकांशी मी डील करत नाही. लोक फक्त अशा गोष्टींबद्दल बोलतात जे त्यांना बाहेर दिसतंय. मात्र हे लोक माझ्या घरी हे पाहायला नसतात ना की मी काय करतोय?”

याविषयी अरबाज पुढे म्हणाला, “असं नाहीये की आम्ही फक्त कॅमेरासमोर चांगले वागतो. आम्ही एकत्र अरहानचा वाढदिवस साजरा करतो. मी माझ्या मुलाचं काम, त्याचं करिअर, गरजा आणि जबाबदाऱ्या यांविषयी मलायकासोबत नेहमी चर्चा करतो. मात्र मला एक गोष्ट समजत नाही की जर मी माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबत बोलत असेन, तर ते पाहून लोकांना आश्चर्य का वाटतं? जर माझ्या मुलाचा फोन लागत नसेल किंवा व्यस्त असेल तर मी माझ्या एक्स-वाइफ मलायकालाच कॉल करतो.”

“मलायका आणि मी पूर्णपणे विभक्त झालोय आणि आम्ही फक्त आपापल्या आयुष्याचाच विचार करतो, असा विचार जर लोक करत असतील तर ते खूपच भोळे आहेत. असं कधीच होत नसतं. जर घटस्फोटीत पालक एकमेकांशी बोलणं थांबवत असतील तर त्याचा मुलांवर वाईट परिणाम होऊ लागले. सुदैवाने आमच्या कुटुंबाला त्याची भीती नाही. अरहानने मला आणि त्याच्या आईला, आहोत तसं स्वीकारलं आहे. तोसुद्धा ठीक आहे”, असं उत्तर अरबाजने दिलं.

अरबाज आणि मलायका यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना 20 वर्षीय अरहान हा मुलगा आहे. अरहान अमेरिकेत त्याचं शिक्षण पूर्ण करतोय. लग्नाच्या 18 वर्षांनंतर अरबाज आणि मलायकाने घटस्फोट घेतला. 2017 मध्ये हे दोघं विभक्त झाले. त्यानंतर मलायका आता अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय. तर अरबाज हा मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करतोय.

Follow Us
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!