AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Armaan Kohli: ड्रग्ज प्रकरणात अरमान कोहलीला वर्षभरानंतर मोठा दिलासा

ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी 'बिग बॉस' फेम अरमानला झाली होती अटक; तुरुंगात काढलं वर्ष

Armaan Kohli: ड्रग्ज प्रकरणात अरमान कोहलीला वर्षभरानंतर मोठा दिलासा
Armaan Kohli Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 20, 2022 | 5:01 PM
Share

ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) अडकलेला अभिनेता अरमान कोहली (Armaan Kohli) गेल्या वर्षभरापासून तुरुंगात आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली होती. आता एक वर्षानंतर अरमानला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायालयाने अरमानला एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे वर्षभरातून त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे.

अरमान कोहलीने यापूर्वी अनेकदा अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र प्रत्येक वेळी न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली. फेब्रुवारी 2022 मध्ये त्याने NDPS कायद्यांतर्गत 14 दिवसांसाठी अंतरिम जामीन मागितला होता, तोदेखील फेटाळण्यात आला. यादरम्यान त्याने आजारी पालकांना भेटण्यासाठी जामीन देण्याची विनंती केली होती. परंतु बचाव पक्ष आणि फिर्यादीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश ए. ए. जोगळेकर यांनी अरमानचा जामीन अर्ज फेटाळला.

गेल्या वर्षी एनसीबीने अरमानच्या मुंबईतील जुहू इथल्या घरावर छापा टाकला होता. यावेळी एनसीबीने त्याच्या घरातून काही प्रमाणात ड्रग्ज जप्त केलं होतं. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अरमानला अटक करण्यात आली होती.

एनसीबीच्या म्हणण्यानुसार कोहलीच्या घरातून 1.2 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं होतं. तर या प्रकरणातील सहआरोपींकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. मुख्य विक्रेता अजय राजू सिंग याची कोठडीत चौकशी केल्यानंतर अरमानला अटक करण्यात आली.

एनसीबीने अरमानला कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याला एनसीबी कोठडी सुनावली. अरमानला एनडीपीएसच्या कलम 21(अ), 27(अ), 28, 29, 30 आणि 35 अंतर्गत अटक करण्यात आली होती.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.