AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या ड्रेसबद्दल आशा पारेख असं काय म्हणाल्या, ज्यावरून नेटकऱ्यांमध्ये होतेय चर्चा

भारतीयांच्या लग्नाच्या ड्रेसवरून आशा पारेख यांची कमेंट; वाचून नेटकऱ्यांचा चढला पारा

लग्नाच्या ड्रेसबद्दल आशा पारेख असं काय म्हणाल्या, ज्यावरून नेटकऱ्यांमध्ये होतेय चर्चा
Asha ParekhImage Credit source: Twitter
| Updated on: Nov 28, 2022 | 10:18 AM
Share

गोवा: ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी महिलांच्या कपड्यांवरून टिप्पणी केली होती. त्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी महिलांच्या कपड्यांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. भारतीय महिला लग्नात वेस्टर्न ड्रेस किंवा गाऊन का परिधान करतात हेच मला समजत नाही असं त्या म्हणाल्या. याउलट त्यांनी घागरा-चोलीची निवड केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. गोव्यात पार पडलेल्या 53 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये त्या बोलत होत्या.

“प्रत्येक गोष्ट बदलली आहे. आता ज्या प्रकारचे चित्रपट बनवले जात आहेत.. माहीत नाही, पण सर्वकाही वेस्टर्नाइज्ड (पाश्चिमात्यकरण) झालं आहे. आजकालच्या मुली लग्नात गाऊन घालून येतात. आपल्याकडे घागरा-चोली, साड्या आणि सलवार-कमीज असा पोशाख आहे, तुम्ही त्याची निवड करा ना”, असं आशा पारेख म्हणाल्या.

“तुम्ही भारतीय कपडे का परिधान नाही करत? ते फक्त ऑनस्क्रीन हिरोइनला बघतात आणि त्यांची कॉपी करू पाहतात. आम्ही जाड असो किंवा कसंही.. पण स्क्रीनवर हिरोइनने जसे कपडे घालते आहेत, तसंच आम्ही पण घालणार असा अट्टहास असतो. हे पाहून मला फार दु:ख होतं. आपली संस्कृती किती सुंदर आहे”, असं त्या पुढे म्हणाल्या.

यावेळी त्यांनी दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत काम का नाही केलं, याचंही कारण सांगितलं. “चार-पाच वर्षांपूर्वी असं वृत्त छापलं गेलं होतं की मला दिलीप कुमार आवडत नाहीत म्हणून मी त्यांच्यासोबत काम केलं नाही. पण हे खोटं आहे. मला नेहमीच त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. जबरदस्त नावाचा चित्रपट आम्ही दोघांनी साइन केला होता. त्यामध्ये आम्ही एकत्र काम करणार होतो. मात्र दुर्दैवाने तो चित्रपट रखडला”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.