AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपूर घराण्यात सून म्हणून आलेल्या अभिनेत्रीने घराण्याचा तो कडक नियम पायदळी तुडवला

कपूर कुटुंब हे इंडस्ट्रीमधील नावाजलेलं कुटुंब. पण या घराण्यात काही नियम होते. पण जेव्हा एक अभिनेत्री या घरात लग्न करून सून म्हणून आली तेव्हा मात्र तिने कपूर घराण्यातील त्या नियमाबद्दल आवाज उठवला आणि सर्वांना विरोध करून आपला मुद्दा खरा ठरवून दाखवला.

कपूर घराण्यात सून म्हणून आलेल्या अभिनेत्रीने घराण्याचा तो कडक नियम पायदळी तुडवला
Babita Kapoor saved the careers of Karisma and Kareena by breaking the rules of the Kapoor familyImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 06, 2025 | 9:51 PM
Share

कपूर घराणं आज बॉलिवूडमध्ये एक नावाजलेलं घराणं आहे जे पिढ्यांपिढ्या चित्रपटसृष्टीत काम करतंय. पृथ्वीराज कपूरपासून रणबीर कपूरपर्यंत, कुटुंबाच्या सर्व पिढ्या हिंदी चित्रपटसृष्टीशी जोडल्या गेल्या आहेत आणि बॉलिवूडला अधिक उंचीवर नेण्यात प्रत्येकाने योगदान दिले आहे.

या सुनेनं कपूर घराण्याचा तो कडक नियम मोडला 

पण सुरुवातीला कपूर घराण्यात काही नियम होते त्यापैकी एक फारच नियम होता तो म्हणजे कपूर घराण्यातील कोणत्याही सुनेने आणि मुलींदेखील लग्नानंतर चित्रपटात काम करायचं नाही.पण घरात एक अभिनेत्री सून म्हणून आली पण तिने हा नियम मोडला अन् पुढच्या पिढीची अभिनयात येण्यासाठी मदत केली. ही सून म्हणजे बबिता.

लग्नानंतर स्वत:ला चित्रपटांपासून दूर केले 

बबिता ही बॉलिवूडची एक अतिशय हुशार अभिनेत्री. त्यांनी अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. लग्नानंतर ती एका चित्रपट कुटुंबाचा भाग बनली असे अनेकांना वाटते पण हे खरे नाही, त्यांचा जन्मही एका चित्रपट कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील हरी शिवदासानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक पात्र अभिनेता होते.

चित्रपटांमध्ये काम करत असताना बबिता रणधीर कपूर यांच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी त्या त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होत्या 1971 नंतर त्यांनी चित्रपटांपासून स्वतःला दूर केले. पण फक्त बबिताच नाही तर अभिनेत्री नीतू कपूर देखील लग्नापूर्वी त्यांच्या काळातील स्टार होत्या, परंतु कपूर कुटुंबाशी संबंध येताच त्या पडद्यावरून गायब झाल्या.

कपूर कुटुंबाच्या नियमांविरुद्ध आवाजही उठवला

नंतर मात्र बबिता यांनी कपूर कुटुंबाच्या नियमांविरुद्ध आवाजही उठवला. एवढंच नाही तर, लग्नानंतर काही काळाने बबिता आणि रणधीर कपूर वेगळे झाले. पण त्यांचा कधीही घटस्फोट झाला नाही. बबिता यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना एकट्याने वाढवले. बबिता यांना तर लग्नानंतर पुन्हा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नाही. पण त्यांना त्यांच्या मुलींना म्हणजे करीना आणि करिश्माला मात्र या बंधनात अडकू द्यायचं नव्हतं. बबिता यांनी हा नियम मोडण्याचं मुख्य कारण म्हणजे अर्थात त्यांच्या मुली होत्या.

त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता 

पण बबितासाठी हा प्रवास इतका सोपा नव्हता कारण करीश्मा कपूर ही कपूर घराण्याची पहिली मुलगी होती जी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार होती पण तिला तिच्या आई बबिता आणि वडील रणधीर कपूर यांच्याकडूनही पाठिंबा मिळाला. जेव्हा करिश्माने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा मात्र कपूर घराण्यातील सुना आणि मुलींसाठी अभिनयाचा मार्ग मोकळा झाला. या सर्व गोष्टींवर करीनाने एका मुलाखतीत भाष्य केलं. करीनाने हे देखील सांगितले की करीश्मा आणि तिला आई-वडिलांनी कायम पाठिंबा दिला आहे. जेणेकरून ते चित्रपट क्षेत्रात करिअर करू शकतील.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान.
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान.
द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, उत्पादनात मोठी घट
द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, उत्पादनात मोठी घट.
अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू
अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू.
विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प;फडणवीस यांची प्रतिक्रिया
विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प;फडणवीस यांची प्रतिक्रिया.
भारतात डेटा सेंटर तयार करणाऱ्याऱ्यांना आर्थिक सूट
भारतात डेटा सेंटर तयार करणाऱ्याऱ्यांना आर्थिक सूट.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यपदी प्रफुल्ल पटेल?चर्चेवर काय केलं ट्विट
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यपदी प्रफुल्ल पटेल?चर्चेवर काय केलं ट्विट.
Budget 2026 Highlights : काय स्वस्त, काय महाग झालं? जाणून घ्या
Budget 2026 Highlights : काय स्वस्त, काय महाग झालं? जाणून घ्या.
7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा! मुंबई-पुणे मार्गाचाही समावेश
7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा! मुंबई-पुणे मार्गाचाही समावेश.
नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू – निर्मला सीतारामन
नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू – निर्मला सीतारामन.