‘भाग्य दिले तू मला’मध्ये लग्नसोहळा विशेष भाग; पारंपरिक पद्धतीने पार पडणार राज-कावेरीचं लग्न

राज-कावेरीसोबतच अख्खा महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो क्षण आता जवळ आला आहे. राज-कावेरीच्या हळूवार प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. हे दोघं कधी एकत्र येणार याची उत्सुकता सगळ्यांना होती.

| Updated on: Feb 24, 2023 | 3:40 PM
1 / 9
लग्न म्हणजे आयुष्यभराचं ऋणानुबंध.. नवी सुरुवात आणि प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण. हाच क्षण आता 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतील राज आणि कावेरीच्या आयुष्यात आला आहे. या दोघांचं लग्न मालिकेत धूमधडाक्यात पार पडणार आहे.

लग्न म्हणजे आयुष्यभराचं ऋणानुबंध.. नवी सुरुवात आणि प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण. हाच क्षण आता 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतील राज आणि कावेरीच्या आयुष्यात आला आहे. या दोघांचं लग्न मालिकेत धूमधडाक्यात पार पडणार आहे.

2 / 9
राज-कावेरीसोबतच अख्खा महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो क्षण आता जवळ आला आहे. राज-कावेरीच्या हळूवार प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. हे दोघं कधी एकत्र येणार याची उत्सुकता सगळ्यांना होती.

राज-कावेरीसोबतच अख्खा महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो क्षण आता जवळ आला आहे. राज-कावेरीच्या हळूवार प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. हे दोघं कधी एकत्र येणार याची उत्सुकता सगळ्यांना होती.

3 / 9
एकीकडे स्वत:ची संस्कृती जपण्याचा ध्यास असणारी आणि परंपरेचा डोळस अभिमान बाळगणारी कावेरी तर दुसरीकडे नाविन्याची कास असणारा राजवर्धन एकमेकांसमोर आले आणि या दोघांमध्ये हळुवार प्रेम फुल गेलं.

एकीकडे स्वत:ची संस्कृती जपण्याचा ध्यास असणारी आणि परंपरेचा डोळस अभिमान बाळगणारी कावेरी तर दुसरीकडे नाविन्याची कास असणारा राजवर्धन एकमेकांसमोर आले आणि या दोघांमध्ये हळुवार प्रेम फुल गेलं.

4 / 9
कावेरी आणि राजच्या या कथेत अनेक अनपेक्षित वळणं आली. कधी गैरसमज, कधी प्रेम, कधी भांडण तर कधी दुरावा आला. मात्र आता एकमेकांच्या साथीने सगळ्यांशी लढत अखेर तो शुभ दिवस आला आहे.

कावेरी आणि राजच्या या कथेत अनेक अनपेक्षित वळणं आली. कधी गैरसमज, कधी प्रेम, कधी भांडण तर कधी दुरावा आला. मात्र आता एकमेकांच्या साथीने सगळ्यांशी लढत अखेर तो शुभ दिवस आला आहे.

5 / 9
मंडप सजला आहे, तोरणं लागली आहेत, मुहूर्तदेखील निघाला आहे आणि स्थळही निश्चित झालं आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 आणि संध्याकाळी 7 वाजता दोन तासांचा विशेष भाग कलर्स मराठीवर रंगणार आहे.

मंडप सजला आहे, तोरणं लागली आहेत, मुहूर्तदेखील निघाला आहे आणि स्थळही निश्चित झालं आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 आणि संध्याकाळी 7 वाजता दोन तासांचा विशेष भाग कलर्स मराठीवर रंगणार आहे.

6 / 9
लग्नासाठी कावेरीचा खास मराठमोळा लूक असणार आहे. नऊवारी नथ, शेला, हिरवा चुडा या लूकमध्ये कावेरी खूप सुंदर दिसत आहे. दोघांचाही अस्सल मराठमोळा बाज दिसून येणार आहे.

लग्नासाठी कावेरीचा खास मराठमोळा लूक असणार आहे. नऊवारी नथ, शेला, हिरवा चुडा या लूकमध्ये कावेरी खूप सुंदर दिसत आहे. दोघांचाही अस्सल मराठमोळा बाज दिसून येणार आहे.

7 / 9
लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे. सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख अशा सगळ्या विधी पर पडणार आहेत. खऱ्या अर्थाने राजला कावेरीची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे.

लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे. सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख अशा सगळ्या विधी पर पडणार आहेत. खऱ्या अर्थाने राजला कावेरीची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे.

8 / 9
रत्नमाला म्हणजेच निवेदिता सराफ यानिमित्ताने म्हणाल्या, "रत्नमालासाठी तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे कारण याच दिवसाची वाट ती कुठेतरी बघत होती. कावेरीच्या आयुष्यात येण्याने राजमध्ये खूप बदल झाले आहेत. मालिकेत रत्नमाला आणि राजचं नातं देखील दृढ झाले आहे. आता मालिकेत राज कावेरीचं लग्न होणार आहे. सेटवर अगदी आनंदी वातावरण आहे, जय्यत तयारी सुरु झाली आहे."

रत्नमाला म्हणजेच निवेदिता सराफ यानिमित्ताने म्हणाल्या, "रत्नमालासाठी तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे कारण याच दिवसाची वाट ती कुठेतरी बघत होती. कावेरीच्या आयुष्यात येण्याने राजमध्ये खूप बदल झाले आहेत. मालिकेत रत्नमाला आणि राजचं नातं देखील दृढ झाले आहे. आता मालिकेत राज कावेरीचं लग्न होणार आहे. सेटवर अगदी आनंदी वातावरण आहे, जय्यत तयारी सुरु झाली आहे."

9 / 9
कावेरीचा लग्नातील खास लूक

कावेरीचा लग्नातील खास लूक

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us