Manoj Jarange Patil : परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगेंनी उपचार सोडले, पाणी बंद; आज दुपारी 12 वाजता कुठली घोषणा करणार?
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगेंनी उपचार सोडले आहेत. त्यानंतर त्यांनी पाणी बंद केलं आहे. त्यानंतर आज दुपारी 12 वाजता मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रविवारी आझाद पोलीस स्टेशनने परवानगी नाकारली. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी कालपासून सलाईन देखील घेण्यास बंद केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कोर्टात जाण्याची देखील तयारी दर्शवली आहे. परवानगी नाकारल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगेंनी मध्यरात्री उपचार देखील नाकारले. त्यानंतर आज सोमवारी मनोज जरांगे पाटील मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सोमवारी सतरावा दिवस आहे. आझाद मैदानावरील आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी उपचार, पाणी बंद केलं आहे. त्यानंतर जरांगे पाटील हे दुपारी बारा वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. अंतरवारी सराटीत रात्री दोन वेळा वैद्यकीय पथक तपासणी करून परत गेले. परंतु त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याची आरोग्य विभागाची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून दुसऱ्यांदा आझाद मैदान पोलिसांना नव्याने परवानगीसाठी अर्ज करण्यात आलाय. परवानगी नाकारल्यास पुन्हा कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली आहे. तर आज सोमवारी दुपारी बारा वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्या आजच्या घोषणेमुळे सरकारसमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाटोदामध्ये जरांगे पाटलांचा पहिला मुक्काम
मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जाताना 15 तारखेचा पहिला मुक्काम बीडच्या पाटोदा शहरात असणार आहे. काल पाटोदा शहरात पूर्व नियोजन बैठक पार पडली, यानंतर 80 एकरवर वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली जात आहे, तर 25 ठिकाणी पार्किंगसह अन्नछत्र उभारण्याचे काम सुरू आहे. परवानगी नाकारल्यानंतर देखील जरांगे पाटलांसह मराठा बांधव मुंबईत जाण्यावर ठाम असून जोरदार तयारी सुरू आहे.
मनोज जरांगे-पाटलांनी थोडं थांबून आंदोलन – मंत्री हसन मुश्रीफ
मनोज जरांगे-पाटील यांनी सण-उत्सव लक्षात घेऊन थोडं थांबून आंदोलन केलं,असतं तर बरं झालं असतं,असं विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. सध्या गणेशोत्सव सुरू झाला असून त्यानंतर नवरात्र असे सणवार आहेत. यामध्ये कायदा- सुव्यवस्थेच्या समस्या पोलिसांच्या समोर असतात. त्यामुळे या गोष्टी म्हणून जरांगे पाटलांनी लक्षात घेऊन आंदोलन थोडे थांबून केलं असतं, तर बरं झालं असतं, असं मत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
