AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 | कविता कौशिकचा एजाजला धक्का, हिंसक वर्तनामुळे घराबाहेर जाणार?

कविता आणि एजाज खान यांच्यात किचनमध्ये सुरू झालेली झुंज आता हिंसक वळण घेणार आहे.

Bigg Boss 14 | कविता कौशिकचा एजाजला धक्का, हिंसक वर्तनामुळे घराबाहेर जाणार?
| Updated on: Nov 17, 2020 | 6:50 PM
Share

मुंबई :बिग बॉस 14’च्या घरातील मैत्रीमध्ये आता फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. एजाज खान (Eijaz Khan) आणि कविता कौशिक (Kavita Kaushik) यांच्यातील मैत्री आता दुष्मनीत बदलली आहे. पुढच्या एपिसोडमध्येही कविता कौशिक आणि एजाज खान यांच्यात जोरदार वाद पाहायला मिळणार आहेत. कविता आणि एजाज खान यांच्यात किचनमध्ये सुरू झालेली झुंज आता हिंसक वळण घेणार आहे. एजाज कविताच्या जवळ जाऊन भांडू लागताच कविताने एजाजला सरळ ढकलेले आहे. कविताच्या या हिंसक खेळीमुळे आता ती घराबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे (Bigg Boss 14 Kavita Kaushik Push Eijaz Khan During Fight).

कविता-एजाज यांचे भांडण पाहून निक्की तंबोली आणि अली गोनी कविताला समजवण्यासाठी पुढे येतात. कोणीही एकमेकाला धक्का मारणार नाही, असा आदेश कर्णधार अली गोनी देतो. मात्र, संतापलेली कविता, माझ्यासमोर जो कोणी येईल त्याला मी धक्का मरेन, असे म्हणताना दिसते.

(Bigg Boss 14 Kavita Kaushik Push Eijaz Khan During Fight)

एजाजची बिग बॉसकडे तक्रार

कविताने धक्का दिल्यावर चिडलेला एजाज कविता कौशिकवर ओरडण्यास सुरुवात करतो. पुन्हा एकदा त्या दोघांमध्ये घमासान सुरू झाले. यानंतर एजाजने कॅमेरासमोर उभे राहत ‘बिग बॉस’कडे याची तक्रार केली. तसेच नियमांचे उल्लंघन केल्याने आणि हिंसा केल्याने कविताला घराबाहेर करण्यात यावे, अशी मागणी एजाजने केली आहे (Bigg Boss 14 Kavita Kaushik Push Eijaz Khan During Fight).

दिवाळीच्या दिवशी कविता-अलीमध्ये जुंपली

दिवाळीनिमित्त ‘बिग बॉस 14’च्या घरात बरेच बॉम्ब फुटताना दिसले. सणाच्या निमित्ताने घरात बरीच धमाल मस्ती पाहायला मिळाली. आनंदाने सुरू झालेला दिवस अखेर भांडणांनीच संपला. नाश्त्याच्या वेळी कविताच्या आरोपांमुळे घरात चांगलीच वादावादी पाहायला मिळाली. ‘पब्लिक डिमांड’वर घरात आलेल्या कविता कौशिकने कर्णधार अली गोनीवर गटबाजी करत असल्याचा आरोप लावला. त्यांनतर अली गोनी आणि कवितामध्ये जोरदार वाद रंगले होते.

‘बिग बॉस 14’च्या ‘वीकेंड का वार’च्या सुरूवातीला घरातील लोक दिवाळी सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसले. पारंपरिक भारतीय लूक तसेच डोक्यावर कव्वाली टोपी परिधान करुन स्पर्धकांनी सलमान खानचे स्वागत केले. तर, दिवाळी निमित्ताने घरात कव्वालीची मैफिल रंगली होती. राहुल वैद्य आणि जान कुमार सानू या दोघांनीही ‘कव्वाली’  सादर करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र, कव्वालीच्या या कार्यक्रमानंतर आता कविता कौशिक आणि ‘कर्णधार’ अली गोनी यांच्या दरम्यान जोरदार भांडण झाले होते.

(Bigg Boss 14 Kavita Kaushik Push Eijaz Khan During Fight)

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.