AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलाच्या वाढदिवशी नवऱ्याने आणली दुसरी पत्नी, भावूक होत पायल म्हणाली, ‘आई – वडिलांना सोडून…’

Payal Malik Love Life : आई - वडिलांना सोडून आली होती म्हणून...', मुलाच्या वाढदिवशी नवऱ्याने आणली दुसरी पत्नी, अखेर भावूक होत अरमान याची पहिली पत्नी पायल हिने व्यक्त केली मनातील खंत, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पायल हिची चर्चा...

मुलाच्या वाढदिवशी नवऱ्याने आणली दुसरी पत्नी, भावूक होत पायल म्हणाली, 'आई - वडिलांना सोडून...'
| Updated on: Jun 22, 2024 | 1:10 PM
Share

यूट्यूबर अरमान मलिक याने पहिली पत्नी पायल मलिक आणि दुसरी पत्नी कृतिका मलिक यांच्यासोबत ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये एन्ट्री केली आहे. ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोचे होस्ट आणि अभिनेते अनिल कपूर यांनी अरमान याला दोन लग्नाबद्दल प्रश्न विचारले तेव्हा पायल हिने भावूक होत सर्व सत्य सांगितलं. अरमान याने मुलाच्या वाढदिवशी कृतिका हिच्यासोबत लग्न केल्याची माहिती पायल हिला दिली.

पायल म्हणाली, ‘मी आणि कृतिका चांगल्या मैत्रिणी होतो. माझ्या मुलाच्या वाढदिवशी कृतिका आणि अरमान यांची ओळख झाली. सेलिब्रेशन संपल्यानंतर कृतिका हिने माझ्याकडून फोटो मागितले. तेव्हा मी तिला सांगितलं, तुझ्या जिजू (अरमान) कडून घे…’

‘तेव्हा अरमान – कृतिका यांना एकमेकांचे मोबाईल नंबर मिळाले आणि दोघांमध्ये बोलणं सुरु झालं. त्यानंतर कृतिका सात दिवस माझ्या घरी राहायला आली. त्या सात दिवसांमध्ये अरमान – कृतिका यांच्यामधील जवळीक वाढली आणि अरमान याने दुसरं लग्न केलं. ‘

पुढे पायल म्हणाली, ‘प्रत्येक जण हसत होते. पण माझ्यासाठी ती वेळ फार कठीण होती. कारण मी माझ्या आई – वडिलांना सोडून आली होती. पण जेव्हा माझ्या समोर अरमान – कृतिका यांच्या लग्नाचे फोटो आणि सर्टिफिकेट आले, तेव्हा मला फार मोठा धक्का बसला.’

‘मी आणि अरमान फक्त पती – पत्नी नव्हतो. आम्ही मित्र म्हणून देखील एकमेकांसोबत राहातो होतो. कारण अरमान याचं कोणीच नाही आणि मी माझे आई – वडील सोडून आली होती. अरमान याने दुसरं लग्न करण्याआधी माझी परवानगी घेतली होती. पण मला वाटलं तो मस्करी करत असेल…’

‘जेव्हा माझ्याकडे दोघांच्या लग्नाचे फोटो आले… तेव्हा मला वाटलं हे काय झालं. आता मी काहीच करु शकत नाही. जर आधी आमचं बोलणं झालं असतं, तर काहीतरी केलं असते…’ असं म्हणत असताना पायल हिच्या डोळ्यात पाणी आलं.

पुढे पायल म्हणाली, ‘आमच्या लग्नाला 13 वर्ष झाली आहेत. अरमान याने लग्नानंतर सर्वकाही माझ्या आणि कृतिकाच्या नावावर केलं आहे.’ सांगायचं झालं तर, अरमान चार मुलांचा बाप आहे. तीन मुलं पायल हिची आहेत तर, एक मुलगा कृतिका हिचा आहे.

अरमान म्हणाला, ‘आम्ही बिग बॉसमध्ये आलो आहोत कारण, आम्हाला सांगायचं आहे की, आमच्या कुटुंबात कोणते वाद नाहीत. आम्ही आनंदाने आयुष्य जगत आहोत…’ सोशल मीडियावर अरमान याचे कुटुंबासोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.