AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSR Case : ‘आमचा तपासच जिंकणार’ म्हणत मुंबई पोलिस आयुक्तांचे सीबीआयला रोकडे सवाल!, पाहा काय म्हणाले परमबीर सिंह….

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) जग सोडून 6 महिन्यांपेक्षाही अधिक काळ झाला आहे.

SSR Case : 'आमचा तपासच जिंकणार' म्हणत मुंबई पोलिस आयुक्तांचे सीबीआयला रोकडे सवाल!, पाहा काय म्हणाले परमबीर सिंह....
| Updated on: Jan 02, 2021 | 10:57 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) जग सोडून 6 महिन्यांपेक्षाही अधिक काळ झाला आहे. सीबीआयकडून (Central Bureau of Investigation) त्याच्या केसची चौकशी केली जात आहे. मात्र, सीबीआयने आतापर्यंत कोणताही अहवाल सादर केला नसल्यामुळे आता सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अगोदर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि आता मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Paramvir Singh) यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. (Bollywood actor Sushant Singh Rajput case)

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाबद्दल बोलताना आयुक्त परमबीर सिंह म्हणाले की, लवकरच सीबीआय सुशांत सिंह राजपूतच्या केसचा अहवाल सादर करेल आणि त्यांचा आणि आमचा अहवाल एक सारखाच असेल अगोदरच सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केलेली चौकशी योग्य आहे. मात्र, काही लोकांनी मुंबई पोलिसांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटी आमचा तपासच जिंकणार आहे.  काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उभे केले होते.

4 जून रोजी सुशांतसिंग राजपूत त्याच्या मुंबईच्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रिया चक्रवर्तीला सुशांतसिंग राजपूत मृत्यू ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. रिया जवळपास 1 महिना तुरूंगात होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रियाला जामीन मंजूर केला आहे.

सुशांतचा प्रवास

स्टार प्लसवर ‘किस देश मे है मेरा दिल’ मालिकेतून 2008 मध्ये टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर झी टीव्हीवर ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रचंड गाजली होती.

पवित्र रिश्ता मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते.

2013 मध्ये ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, पीके असे सिनेमे गाजले.

एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. या भूमिकेने तो यशोशिखरावर पोहोचला. नुकतेच त्याचे केदारनाथ, छिछोरे हे चित्रपट लोकप्रिय ठरले.

संबंधित बातम्या : 

Sushant Singh Rajput | मैत्रिणीसोबत तणावाचे संबंध, सुशांतसिंह राजपूतच्या नोकराचा दावा

Sushant Singh Rajput | चार दिवसापूर्वी मॅनेजरची इमारतीवरुन उडी, आज सुशांतचा गळफास

(Bollywood actor Sushant Singh Rajput case)

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.