AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला हवं ते सगळं मिळालं नाही, कारण…’, धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणून हेमा मालिनी यांचा संघर्ष

'मला पश्चाताप होत आहे, पण...', दोन मुलींच्या जन्मानंतर कसं होतं हेमा मालिनी यांचं आयुष्य, धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणून अभिनेत्रीने केलाय अनेक गोष्टीचा सामना

'मला हवं ते सगळं मिळालं नाही, कारण...', धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणून हेमा मालिनी यांचा संघर्ष
| Updated on: Apr 06, 2023 | 9:57 AM
Share

मुंबई : अभितेने धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमाचे किस्से आज देखील चाहत्यांमध्ये रंगतात. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाआधी दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं. मोठ्या पडद्यावर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर हेमा मालिनी यांना दुसऱ्या पत्नीचा दर्जा मिळाला. पण त्यांना कधीही आयुष्यात जे हवं ते मिळालं नाही. हेमा यांनी अनेकदा मुलाखतींच्या माध्यमातून त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

२०१८ मध्ये झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी धर्मेंद्र आणि दोन मुलींबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मुलाखतीत अभिनेत्रीला विचारण्यात आलं की, ‘तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी आहात?’ यावर हेमा म्हणाल्या, ‘मी असं नाही म्हणणार की सर्व काही ठिक आहे. प्रत्येकाला आयुष्यात जे हवं आहे, ते मिळत नाही. व्यक्ती जेव्हा तरुण वयात असतो, तेव्ह परफेक्ट आयुष्याचे स्वप्न पाहत असतो. पण त्याचा काहीही अर्थ नसतो…’

पुढे हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मला ते सगळं मिळालं नाही, जे मला हवं होतं. पण ज्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या, त्या गोष्टींच्या आठवणीत राहणं मी बंद केलं. माझ्याकडे दोन मुली होत्या. मी माझ्या आयुष्यातील तीस वर्ष माझ्या दोन मुलींसोबत जगले आहेत. त्यांना शाळेत सोडणं, त्याचा अभ्यास घेणं, केस करणं, त्यांचे हट्ट पुरवणं… दोघींमुळे मी पुन्हा बालपण जगले.’

‘आता दोघी मोठ्या झाल्या आहे. आता मी मागे वळून पाहते, तर मला असं वाटतं काही तरी मागे राहिलं आहे. ज्यांची मला आजही आठवण येते. आयुष्याच्या प्रत्येत टप्प्यावर मी धर्मेंद्र यांची आठवण काढली. जेव्हा लग्न झालं, तेव्हा मला वाटलं गोष्टी जुळून येतील. पण तसं काही झालं नाही. जी परिस्थिती आहे, ती मी स्वीकारली होती.’

हेमा मालिनी पुढे म्हणाल्या, ‘मला माझ्या मुली भेटल्या. त्यांचा सांभाळ करताना अनेक अडचणी आल्या. एक व्यक्ती म्हणून आजही पश्चाताप होत आहे, पण ते माझ्यावर प्रचंड प्रेम करतात. जेव्हा त्यांचा विचार करते, त्यांच्या भावनांचा विचार करते, तेव्हा सगळं काही ठिक वाटतं. त्यांची अनुपस्थिती देखील… ‘

समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये लग्न केलं. प्रकाश कौर यांच्यासोबत घटस्फोट न घेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. लग्नाच्या जवळपास ४० वर्षांनंतर देखील आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.