AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईच्या एका अटीमुळे ‘ही’ अभिनेत्री अडकली विवाहबंधनात; लग्नानंतर एका वर्षात तिच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

आईची एक अट मान्य करणं बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला पडलं महागात... लग्नानंतर एका वर्षांत तिचं पूर्ण आयुष्यच बदललं.. पतीकडून अपेक्षा तर ठेवल्या पण...

आईच्या एका अटीमुळे 'ही' अभिनेत्री अडकली विवाहबंधनात; लग्नानंतर एका वर्षात तिच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर
| Updated on: Jul 04, 2023 | 12:26 PM
Share

मुंबई : बॉलिवूडमध्ये आईच्या अटीमुळे अनेक अभिनेत्रींनी लग्न केलं. पण लग्नानंतर काही वर्षात अभिनेत्रींच्या आयुष्यात अनेक संकटं आली. खासगी आयु्ष्यात आलेल्या चढ – उतारांच्या सामना अभिनेत्रींना मोठ्या धैर्याने केला. पण आठवणी कोणी विसरु शकत नाही. अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या आयुष्यात देखील अनेक संकटं आली. नीना गुप्ता आणि विवियन रिटर्ड्स यांच्या नात्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. पण नीना गुप्ता यांच्या पहिल्या लग्नाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. नीना गुप्ता यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये नीना गुप्ता यांच्या पहिल्या लग्नाबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे. नीना गुप्ता यांचं पहिलं लग्न एक वर्ष देखील टिकलं नव्हतं.

नीना गुप्ता यांचं लग्न फार कमी वयात झालं आणि त्याचं वर्षी अभिनेत्रीचं घटस्फोट झालं. तेव्हा नीना गुप्ता आयआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होत्या. संस्कृत विषयात नीना गुप्ता पदवीचं शिक्षण घेत होत्या. नीना गुप्ता यांच्या पहिल्या पतीचं नाव अमलान कुसूम घोष असं होतं. अमलान आणि नीना एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते.

सध्या अमलान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते प्रोलॉजिक फर्स्ट कंपनीचे सीईओ आहेत. नीना गुप्ता यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये लिहिल्या प्रमाणे नीना म्हणाल्या, ‘अमलान आणि मी लपून कॉलेज कॅम्पसमध्ये भेटायचो. हॉस्टेल आणि माझ्या घराजवळ भेटायचो.. अमलान यांचे आजोबा माझ्या घाराशेजारी राहायचे. म्हणून सण किंवा सुट्टी असेल तेव्हा आजोबांकडे यायचे..’

नीना गुप्ता यांच्या नात्याबद्दल एका मैत्रीणीच्या घरी कळालं. त्याचा फार मोठा परिणाम दोघांच्या नात्यावर झाला नाही. पण नीना गुप्ता यांचं श्रीनगर याठिकाणी जाणं रद्द झालं. अशात नीना गुप्ता यांच्या आईने एक अट ठेवली. बाहेर जायचं असेल तर, अमलान याच्यासोबत लग्न करावं लागेलं अशी अट अभिनेत्री आईने घातली..

नीना गुप्ता यांनी देखील कोणताच विचार न करता आईची अट मान्य केली. पण अमलान यांच्यासोबत लग्न करणं अभिनेत्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. नीना गुप्ता म्हणाल्या, ‘प्रत्येक गोष्टीकडे अमलान यांचा पाहण्याचा दृष्टीकोण फार वेगळा होता. मला कायम वाटयचं नातं पुढे जायला हवं. कुटुंबाचा विचार करायला हवा. पण नात्यात मला माझ्या पतीकडून अपेक्षा फार होत्या. ‘

‘मी कधीच स्वतःला एक सामान्य गृहिणी सारखं समजलं नाही. मला आयुष्यात खूप काही हवं होतं. त्यानंतर जेव्हा थिअटर करायला लागली तेव्हा मला माझा मार्ग स्पष्ट दिसू लागला..’ असं देखील नीना गुप्ता म्हणाला.

बॉलिवूडमध्ये काम करत असताना नीना गुप्ता यांच्या आयुष्यात विवियन रिचर्ड्स यांची एन्ट्री झाली. विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची एक मुलगी देखील आहे. एवढंच नाही, विवियन रिचर्ड्स यांनी कधीही नीना यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. कारण ते विवाहित होते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.