AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: ‘भारत-पाकिस्तानला वेगळं करण्याचं कामच..’; पराभवानंतर सेलिब्रिटींचं ट्विट

टीम इंडियाच्या पराभवानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींकडून ट्विट्सचा वर्षाव

IND vs ENG: 'भारत-पाकिस्तानला वेगळं करण्याचं कामच..'; पराभवानंतर सेलिब्रिटींचं ट्विट
टीम इंडियाच्या पराभवानंतर सेलिब्रिटींचं ट्विटImage Credit source: Twitter
| Updated on: Nov 10, 2022 | 7:38 PM
Share

मुंबई- भारतीय क्रिकेट टीमचं टी-20 वर्ल्ड कप 2022 चं स्वप्न तुटलं आहे. गुरुवारी भारत आणि इंग्लंडदरम्यान टी-20 वर्ल्डकपसाठी सेमी-फायनलचा सामना रंगला. या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर देशभरातील क्रिकेटप्रेमींकडून निराशा व्यक्त केली जात आहे. अशातच बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनीही या सामन्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘सेमी फायनलमध्ये आपण जिंकू शकलो नाही. इंग्लंडची खेळी चांगली होती आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छा’, असं ट्विट अभिनेता अर्जुन रामपालने केलं. अभिनेता अजय देवगणने मोठी पोस्ट लिहित भारतीय क्रिकेटर्सची साथ दिली आहे.

‘संपूर्ण देशाचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही तुमचं हृदय आणि आत्मा पणाला लावून मेहनत घेता. जरी तुमचा प्रवास फायनलच्या आधीच संपला असला तरी इथपर्यंत आम्ही तो खूप एंजॉय केला. तुमच्यावर असलेल्या दबावाची मी कल्पनासुद्धा करू शकत नाही. विजय किंवा पराजय हा खेळाचा एक भाग असतो. तुम्ही आणखी शक्तीशाली होऊन परत याल यावर माझा विश्वास आहे’, अशा शब्दांत अजयने टीम इंडियाला आधार दिला.

‘दमदार कामगिरीबद्दल इंग्लंडच्या टीमला शुभेच्छा. भारतीय टीममधील खेळाडूंच्या खांद्यावर पराभवाचं हे ओझं खूप मोठं असेल पण अशा वेळी आपल्यालाच ते ओझं हलकं करायचं असतं. टीम इंडिया, हा दिवस निराशाजनक होता. पण कहाणी इथेच संपत नाही. हा फक्त कथेचा एक भाग होता. आपण आणखी शक्तीशाली बनून पुढे येऊ’, असं ट्विट फरहान अख्तरने केलं.

केआरकेच्या ट्विटचीही सोशल मीडियावर चर्चा होतेय. ‘भारत आणि पाकिस्तानला वेगळं करणं हे ब्रिटिशर्सचं कामच आहे. पुन्हा एकदा त्यांनी हे काम खूप चांगल्या पद्धतीने केलं’, असं ट्विट कमाल आर खानने केलंय.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.