AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan | आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार? जाणून घ्या नेमकं सत्य काय…

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ आमिर खान (Aamir Khan) त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असतो. त्याचे आधी रीना दत्तासोबत लग्न झाले होते. त्यानंतर दिग्दर्शक किरण रावसोबत त्याने लग्नगाठ बांधली.

Aamir Khan | आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार? जाणून घ्या नेमकं सत्य काय...
Aamir Khan
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 11:06 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ आमिर खान (Aamir Khan) त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असतो. त्याचे आधी रीना दत्तासोबत लग्न झाले होते. त्यानंतर दिग्दर्शक किरण रावसोबत त्याने लग्नगाठ बांधली. 3 जुलै रोजी किरण आणि आमिरने घटस्फोटाची घोषणा केली. त्यांच्या घटस्फोटासाठी अभिनेत्री फातिमा सना शेखला जबाबदार धरण्यात आले होते. त्यानंतर आमिर तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याची बातमी आता चर्चेत आली आहे.

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान सध्या त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, आमिर एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमिर त्याच्या लग्नाची घोषणा करेल, असे म्हटले जात होते. आता याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

आमिर तिसरे लग्न करतोय?

3 जुलै रोजी किरण आणि आमिरने घटस्फोटाची घोषणा केली. त्यांच्या घटस्फोटासाठी अभिनेत्री फातिमा सना शेखला जबाबदार धरण्यात आले होते. त्यानंतर आमिर तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याची बातमी आली. मात्र, त्याच्या जवळच्या सूत्राने ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे.

आमिरसोबतच्या नात्यावर बोलली फातिमा

आमिर खानला डेट करत असल्याच्या अफवेवर फातिमा सना शेखने तिची प्रतिक्रिया दिली. ‘दंगल’ चित्रपटानंतर दोघांची नावे जोडली जात होती. याबाबत फातिमा म्हणाली होती, ‘काही अनोळखी लोक, ज्यांना मी कधीही भेटले नाही, ते माझ्याबद्दल लिहित आहेत. त्यांना सत्य काय आहे, हे देखील माहित नाही. त्यांचे लेखन वाचणाऱ्यांना वाटते की, मी चांगली माणूस नाही. मला वाटतं त्या लोकांना मी सांगायला हवं वकी, मला विचारा, मी तुम्हाला योग्य उत्तर देईन. मला त्रास होतो, कारण त्यांनी माझ्याबद्दल चुकीचा विचार करू नये, असे मला वाटते.’

किरण-आमिरचे लग्न अन् घटस्फोट

आमिर खानच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलायचे झाले, तर 2001 मध्ये त्याची किरण रावशी भेट झाली. दोघांनी ‘लगान’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात आमिर खान नायक होता आणि किरण राव सहाय्यक दिग्दर्शक होती. 2002 मध्ये आमिरने पत्नी रीना दत्तासोबत घटस्फोट घेतला होता. यानंतर किरण आणि आमिर पुन्हा भेटले. दोघांनी 2005 मध्ये लग्न केले. त्यानंतर 2011 मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांनी आझाद राव-खान अर्थात मुलाचे स्वागत केले. आमिर आणि किरण वेगळे झाले आहेत, पण मुलासाठी ते नेहमी एकत्र राहतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

Kangana Ranaut Controversy | कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, ‘भीकेचं स्वातंत्र्य’ वक्तव्याप्रकरणी कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल!

Happy Birthday Amruta Khanvilkar | ‘वाजले की बारा..’ म्हणत गाजवलं मराठी विश्वं तर, हिंदीतही अमृता खानविलकरला पाहण्यास प्रेक्षक ‘राझी’!

Special Story | केवळ ‘Two Indias’ नाही तर, वीर दास आणि वादांचं जुनं कनेक्शन, काहीना काही कारणांमुळे सतत राहिलाय चर्चेत!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.