AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Kumar | अखेर अक्षय कुमार याने चित्रपटाच्या फी संदर्भातील चर्चांवर सोडले माैन, म्हणाला…

अक्षय कुमार याला खिलाडी कुमार म्हणून देखील ओळखले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत.

Akshay Kumar | अखेर अक्षय कुमार याने चित्रपटाच्या फी संदर्भातील चर्चांवर सोडले माैन, म्हणाला...
| Updated on: Jan 24, 2023 | 3:16 PM
Share

मुंबई : अक्षय कुमार त्याच्या आगामी सेल्फी या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. अक्षय कुमार (Akshay Kumar) हा बाॅलिवूडमधील असा एकमेव अभिनेता आहे, ज्याचे दरवर्षी चार ते पाच मोठ्या बजेटचे चित्रपट रिलीज होतात. अनेकदा काहीजण यामुळे अक्षय कुमार याच्यावर टीका देखील करतात. अक्षय कुमार कायमच त्याच्या फिटनेसकडे लक्ष देतो. रात्री दहाच्या अगोदर झोपणे आणि सकाळी चार वाजता उठून व्यायाम करणे हा अक्षय कुमारचा नित्यक्रम आहे. अक्षय कुमार याला खिलाडी कुमार म्हणून देखील ओळखले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. एका मागून एक असे तब्बल तीन चित्रपट अक्षय कुमार याचे फ्लाॅप गेले आहेत.

अक्षय कुमार याला काही दिवसांपूर्वी चित्रपट फ्लाॅप जाण्याचे कारण विचारण्यात आले होते. यावेळी बोलताना अक्षय कुमार म्हणाला होता की, माझे चित्रपट फ्लाॅप जाण्यास मीच कारणीभूत आहे. यामध्ये दुसऱ्या कोणाचाही दोष नाहीये. प्रेक्षकांना काय हवे याकडे मी लक्ष द्यायला हवे.

बऱ्याचदा अक्षय कुमार चित्रपटासाठी तगडी फी आकारतो, असा आरोप केला जातो. असे म्हटले जाते की, अक्षय कुमार हा एका चित्रपटासाठी तब्बल ५० ते १०० कोटी फी घेतो.

नुकताच सेल्फी या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळी पैपराजी यांनी अक्षय कुमार याला मोठ्या फी विषयी प्रश्न विचारला असता. अक्षय कुमार याने अत्यंत मजेदार पध्दतीने उत्तर दिले आहे.

अक्षय कुमार म्हणाला, माझे रिएक्शन चांगले असते…आणि असले पण पाहिजे…कारण ही सकारात्मक गोष्ट आहे ना…आता अक्षय कुमार याचे हे बोलणे चर्चेचा विषय ठरला आहे.

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार हा कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचला होता. यावेळी अक्षय कुमार मजेदार शैलीमध्ये कपिल शर्मा याची फिरकी घेताना म्हणाला की, कपिलची नजर लागल्यामुळेच माझे चित्रपट चालत नाहीयेत.

२०२३ हे वर्ष देखील अक्षय कुमार याच्यासाठी खास ठरणार आहे. कारण या वर्षामध्येही अक्षय कुमार याचे मोठ्या बजेटचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अक्षय कुमार याच्यासोबत सेल्फी या चित्रपटामध्ये इमरान हाश्मी देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. आता अक्षय कुमार याचा सेल्फी चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.