अमिताभ बच्चन, शाहरुख, अजय, रणवीर सिंगविरोधात याचिका दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

| Updated on: May 21, 2022 | 11:37 AM

बिहारमधील सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी मुझफ्फरपूरमधील न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारीसमोर ही याचिका दाखल केली. अशा प्रकारच्या ब्रँडच्या जाहिराती करून कलाकारांनी लोकांना तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करण्यास प्रोत्साहित केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे.

अमिताभ बच्चन, शाहरुख, अजय, रणवीर सिंगविरोधात याचिका दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
Amitabh, Ajay, Shahrukh and Ranveer
Image Credit source: Facebook
Follow us on

बिहारमधील न्यायालयासमोर गुरुवारी दाखल केलेल्या याचिकेत अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यावर गुटखा आणि तंबाखूच्या सेवनाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून अजय देवगण हा तंबाखू (tobacco) ब्रँड ‘विमल’चा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. तर गेल्या वर्षी शाहरुख खानही (Shah Rukh Khan) ‘विमल’च्या जाहिरातीत झळकला. अमिताभ बच्चन यांनीसुद्धा ‘कमला पसंद’साठी ब्रँड ॲम्बेसेडरची ऑफर स्वीकारली होती. तर रणवीर सिंगनेही पान मसालाची जाहिराती केली होती. बिहारमधील सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी मुझफ्फरपूरमधील न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारीसमोर ही याचिका दाखल केली. अशा प्रकारच्या ब्रँडच्या जाहिराती करून कलाकारांनी लोकांना तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करण्यास प्रोत्साहित केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे.

गुटखा आणि पान मसालाची जाहिरात स्वीकारून आपल्या सेलिब्रिटी स्टेटसचा गैरवापर करणाऱ्यांमध्ये तमन्नाने अभिनेता रणवीर सिंगचं नावदेखील घेतलं आहे. या कलाकारांविरुद्ध आयपीसी कलम 311, 420, 467 आणि 468 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात तंबाखू ब्रँड ‘विमल’च्या जाहिरातीत झळकल्यामुळे अभिनेता अक्षय कुमारवर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर अक्षयने जाहिरातीतून माघार घेतली. विमलच्या या जाहिरातीत अजय देवगण आणि शाहरुख खानदेखील होते.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

ऑक्टोबर 2021 मध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘कमला पसंद’या च्युइंग तंबाखूच्या ब्रँडसोबतचा त्यांचा करार रद्द केला होता. अमिताभ यांना काही तपशीलांची माहिती नसल्याचं त्यांच्या कार्यालयाने एका निवेदनात स्पष्ट केलं. ‘अमिताभ बच्चन हे जेव्हा ब्रँडशी जोडले गेले, तेव्हा त्यांना माहित नव्हतं की ते तंबाखूच्या जाहिरातींच्या अंतर्गत येतं. आता त्यांनी ब्रँडसोबतचा करार संपुष्टात आणला आहे. त्याचसोबत जाहिरातीसाठी मिळालेले पैसे परत केले आहेत,’ असं त्या निवेदनात म्हटलं होतं. नोव्हेंबरमध्ये बिग बींनी संबंधित कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली होती. करार संपुष्टात येऊनही कंपनीने त्यांच्या जाहिरातींचे प्रसारण सुरू ठेवल्याने त्यांनी ही नोटीस पाठवली होती.