SSR Case : ‘आमचा तपासच जिंकणार’ म्हणत मुंबई पोलिस आयुक्तांचे सीबीआयला रोकडे सवाल!, पाहा काय म्हणाले परमबीर सिंह….

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) जग सोडून 6 महिन्यांपेक्षाही अधिक काळ झाला आहे.

SSR Case : 'आमचा तपासच जिंकणार' म्हणत मुंबई पोलिस आयुक्तांचे सीबीआयला रोकडे सवाल!, पाहा काय म्हणाले परमबीर सिंह....
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 10:57 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) जग सोडून 6 महिन्यांपेक्षाही अधिक काळ झाला आहे. सीबीआयकडून (Central Bureau of Investigation) त्याच्या केसची चौकशी केली जात आहे. मात्र, सीबीआयने आतापर्यंत कोणताही अहवाल सादर केला नसल्यामुळे आता सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अगोदर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि आता मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Paramvir Singh) यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. (Bollywood actor Sushant Singh Rajput case)

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाबद्दल बोलताना आयुक्त परमबीर सिंह म्हणाले की, लवकरच सीबीआय सुशांत सिंह राजपूतच्या केसचा अहवाल सादर करेल आणि त्यांचा आणि आमचा अहवाल एक सारखाच असेल अगोदरच सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केलेली चौकशी योग्य आहे. मात्र, काही लोकांनी मुंबई पोलिसांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटी आमचा तपासच जिंकणार आहे.  काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उभे केले होते.

4 जून रोजी सुशांतसिंग राजपूत त्याच्या मुंबईच्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रिया चक्रवर्तीला सुशांतसिंग राजपूत मृत्यू ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. रिया जवळपास 1 महिना तुरूंगात होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रियाला जामीन मंजूर केला आहे.

सुशांतचा प्रवास

स्टार प्लसवर ‘किस देश मे है मेरा दिल’ मालिकेतून 2008 मध्ये टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर झी टीव्हीवर ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रचंड गाजली होती.

पवित्र रिश्ता मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते.

2013 मध्ये ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, पीके असे सिनेमे गाजले.

एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. या भूमिकेने तो यशोशिखरावर पोहोचला. नुकतेच त्याचे केदारनाथ, छिछोरे हे चित्रपट लोकप्रिय ठरले.

संबंधित बातम्या : 

Sushant Singh Rajput | मैत्रिणीसोबत तणावाचे संबंध, सुशांतसिंह राजपूतच्या नोकराचा दावा

Sushant Singh Rajput | चार दिवसापूर्वी मॅनेजरची इमारतीवरुन उडी, आज सुशांतचा गळफास

(Bollywood actor Sushant Singh Rajput case)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.