AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठवणीही नकोत; समंथाने नागा चैतन्यला परत केली लग्नातली साडी?

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) ही टॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडी आहे. या दोघांचं लग्न जितकं चर्चेत होतं, त्याहून अधिक त्यांच्या घटस्फोटाची चर्चा झाली.

आठवणीही नकोत; समंथाने नागा चैतन्यला परत केली लग्नातली साडी?
समंथा-नागा चैतन्यच्या लग्नातील फोटोImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 12, 2022 | 11:41 AM
Share

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) ही टॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडी आहे. या दोघांचं लग्न जितकं चर्चेत होतं, त्याहून अधिक त्यांच्या घटस्फोटाची चर्चा झाली. लग्नाच्या अवघ्या चार वर्षांतच ही जोडी विभक्त झाली. या दोघांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. घटस्फोटानंतर समंथा अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त झाली. यावेळी तिने ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर दिलं. आता समंथाने तिची लग्नातली साडी (Wedding Saree) नागा चैतन्यला परत केल्याचं समजतंय. समंथाने लग्नात नागा चैतन्यची आजी डी. राजेश्वरी यांची साडी परिधान केली होती. हीच साडी तिने आता नागा चैतन्यला परत केल्याचं कळतंय. 2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथा आणि नागा चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर समंथाने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून अक्किनेनी हे आडनावसुद्धा काढून टाकलं.

समंथाची साडी ही डग्गुबती कुटुंबीयांकडून असल्याने तिने ती परत करण्याचा निर्णय घेतला. नागा चैतन्यची आजी आणि निर्माते डी. रामनायडू यांची पत्नी डी राजेश्वरी यांनी ती साडी परिधान केली होती. तीच साडी समंथाने तिच्या लग्नात परिधान केली होती. त्या साडीबद्दल समंथाने सोशल मीडियावर पोस्टसुद्धा लिहिली होती. नागा चैतन्य किंवा त्याच्या कुटुंबीयांच्या कोणत्याही आठवणी नकोत, म्हणून समंथाने साडी परत करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.

6 ऑक्टोबर 2017 रोजी समंथा आणि नागा चैतन्यने लग्नगाठ बांधली. या दोघांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच आहे. दोघं जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना भेटले, तेव्हा दोघंही दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. 2009 मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समंथा-नागा चैतन्यची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यावेळी समंथा ही अभिनेता सिद्धार्थला तर नागा चैतन्य हा श्रुती हासनला डेट करत होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समंथा-नागा चैतन्यमध्ये चांगली मैत्री झाली. 2015 मध्ये जेव्हा दुसऱ्या चित्रपटानिमित्त दोघं पुन्हा भेटले, तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 मध्ये गोव्यात दोघांनी लग्नगाठ बांधली.

हेही वाचा: 

“गरज पडली तर मी पुन्हा शेंगदाणे विकेन”, अपघातानंतर शहाणपण, कच्चा बदाम स्टार भुबन बड्याकारचा माफीनामा

‘मला म्हणतात, तू तिसऱ्यांदा लग्न करू नको, हे ठरवणारे तुम्ही कोण?’, श्वेता तिवारी भडकली

Follow Us
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार