AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Richa Chadha | ‘ऋचा चड्ढा’च्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार? गृहमंत्र्यांनी दिले संकेत

सोशल मीडियावर ऋचा हिच्या विरोधात मोठी मोहिम सुरू आहे.

Richa Chadha | 'ऋचा चड्ढा'च्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार? गृहमंत्र्यांनी दिले संकेत
| Updated on: Nov 26, 2022 | 9:51 PM
Share

मुंबई : ऋचा चड्ढा हिच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. ऋचाने गलवानवर केलेल्या त्या विधानावरून मोठा गदारोळ होताना दिसत आहे. फक्त बाॅलिवूडच नाही तर राजकारणातील अनेकांनी ऋचाच्या या विधानाचा निषेध केलाय. सोशल मीडियावर ऋचा हिच्या विरोधात मोठी मोहिम सुरू आहे. अनेकांनी ऋचा हिच्या आगामी चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणीही केलीये. ऋचाने वादग्रस्त विधानावर अगोदरच माफी मागितली आहे, तरीही हे प्रकरण शांत होण्याचे नाव घेत नाहीये.

आता या सर्व प्रकरणात थेट मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी उडी घेतलीये. इतकेच नाही तर त्यांनी ऋचाच्या मानसिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करत तिचा चांगलाच समाचार घेतला आहे.

गृहमंत्री नरोत्तम दास मिश्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तिची मानसिकता टुकडे टुकडे टोळीची आहे, त्यामुळेच ती लष्कराच्या विरोधात काहीही बोलत आहे.

पुढे नरोत्तम दास म्हणाले की, ऋचा चड्ढाच्या अशाप्रकारे बोलण्याने देशातील जनता दुखावली आहे. इतकेच नाही तर तिच्याविरोधात तक्रार आल्यास एफआयआर नोंदवून तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

श्रद्धाच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे करण्यात आले पण त्यावेळी ही ऋचा चड्ढा का बोलली नाही? असेही नरोत्तम दास म्हणाले आहेत. सतत ऋचा चड्ढा विरोधात संताप वाढताना दिसतोय.

प्रकाश राज यांनी मात्र ऋचा चड्ढाच्या विधानाचे समर्थ केले असून तिच्यासाठी ते मैदानात देखील उतरले आहेत. अक्षय कुमारने ऋचा चड्ढाला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खडेबोल सुनावले आहेत.

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...