AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ज्या चित्रपटांमध्ये भारताला वाईट दाखवतात तेच..”; ऑस्कर अकॅडमीबाबत कंगना यांचं परखड मत

भारताकडून ऑस्करसाठी 'लापता लेडीज' हा चित्रपट पाठवण्यात आला होता. मात्र ऑस्करने या चित्रपटाला नाकारलं. त्यानंतर आता कंगना राणौत यांनी त्यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. ज्या चित्रपटांमध्ये भारताला वाईट दाखवलं जातं, तेच ऑस्कर निवडतं.. असं त्यांनी म्हटलंय.

ज्या चित्रपटांमध्ये भारताला वाईट दाखवतात तेच..; ऑस्कर अकॅडमीबाबत कंगना यांचं परखड मत
Kangana RanautImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 09, 2025 | 3:54 PM
Share

दिग्दर्शिका किरण रावच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला भारताकडून अत्यंत प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी पाठवण्यात आलं होतं. मात्र ऑस्करकडून या चित्रपटाची निवड झाली नाही. यानंतर भारताकडून ऑस्करसाठी पाठवल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या विषयांवरून देशात चर्चेला सुरुवात झाली. अशातच अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी यावर बेधडक प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्करसाठी जे चित्रपट निवडले जातात, त्यावरून त्यांनी टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना त्यांच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त विविध मुलाखती देत आहेत. अशाच एका मुलाखतीत कंगना यांनी ऑस्करबद्दल आपलं मत मांडलंय.

ज्या चित्रपटांमध्ये भारताला वाईट दाखवलं जातं, तेच ऑस्करसाठी निवडले जातात, असं वक्तव्य कंगना यांनी केलंय. याविषयी त्या पुढे म्हणाल्या, “सहसा भारतासाठी ते जो अजेंडा पुढे आणतात, तो खूप वेगळा असतो. ऑस्कर भारतविरोधी चित्रपटांची निवड करतो. आतासुद्धा एक चित्रपट आहे ज्याला लोकांकडून खूप प्रेम मिळतंय, मी त्यासाठी खूप उत्सुक होती. मी त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना बोलताना ऐकलं होतं की भारतात धार्मिक असहिष्णुतेमुळे तुम्हाला हवं तसं प्रेम करण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. मी चित्रपट पाहिलासुद्धा नाही. ऑस्करसाठी असा चित्रपट लागतो जो देशाचं वाईट चित्रण करतो. स्लमडॉग मिलेनियर, इत्यादी.. तो नेहमीच असा चित्रपट असावा जो देशाला घाणेरडं दाखवेल.”

“इमर्जन्सी तसा चित्रपट नाही. आज भारत कसा उभा आहे हे पाहण्यासाठी पाश्चिमात्य देश तयार आहेत. मला या पुरस्कारांची कधीच पर्वा नव्हती. मला भारतीय किंवा पाश्चिमात्य पुरस्कारांची अजिबात पर्वा नाही. हा एक असा चित्रपट आहे जो उत्कृष्टपणे बनवला गेला आहे आणि तो कोणत्याही आंतरराष्ट्रीय चित्रपटाइतकाच चांगला आहे. पण मला हेसुद्धा माहित आहे की जियोपॉलिटिक्स (भूराजकारण) कसं काम करतं? आमच्यासारख्या राष्ट्रवादी लोकांना या पुरस्कार सोहळ्यांपासून फारशी आशा नाही”, असं कंगना यांनी स्पष्ट केलं.

कंगना राणौत यांनी दिग्दर्शक केलेला ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट येत्या 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबतच चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, विशाक नायर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी, सतीश कौशिक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Follow Us
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.