AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Alia: नीतू कपूर यांनी सांगितला रणबीरच्या वरातीचा धमाल किस्सा; दक्षिण आफ्रिकेतील लग्न रद्द करण्यामागचं कारणही आलं समोर

जवळपास महिनाभरानंतर त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नातील बऱ्याच गोष्टी, धमाल किस्से उलगडून सांगितले आहेत. रणबीर आणि आलियाला (Ranbir Alia) दक्षिण आफ्रिकेत डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

Ranbir Alia: नीतू कपूर यांनी सांगितला रणबीरच्या वरातीचा धमाल किस्सा; दक्षिण आफ्रिकेतील लग्न रद्द करण्यामागचं कारणही आलं समोर
Ranbir Alia WeddingImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 09, 2022 | 9:59 AM
Share

गेल्या महिन्यात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) लग्नबंधनात अडकले. या लग्नाविषयीची प्रत्येक माहिती दोघांच्या कुटुंबीयांना गुलदस्त्यात ठेवली होती. लग्नाच्या एक दिवस आधी रणबीरची आई नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी उद्या लग्न होणार असल्याचं फोटोग्राफर्सना सांगितलं. आता जवळपास महिनाभरानंतर त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नातील बऱ्याच गोष्टी, धमाल किस्से उलगडून सांगितले आहेत. रणबीर आणि आलियाला दक्षिण आफ्रिकेत डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं, असंही त्यांनी सांगितलं. रणबीर-आलियाच्या लग्नाला 40 पाहुणे आणि त्यानंतर रिसेप्शनला 40 पाहुणे उपस्थित होते. लग्नात नीतू यांनी रिधिमा कपूर, समारा कपूर, करिश्मा आणि करीना कपूर, रिमा जैन आणि इतरांसोबत मिळून सरप्राइज डान्स परफॉर्मन्स केला होता. एका दिवसात त्यांनी या परफॉर्मन्सची तयारी केल्याचं नीतू यांनी सांगितलं. ‘मेहंदी है रचनेवाली’, ‘ढोलिडा’, ‘क्युटी पाई’ या गाण्यांवर त्यांनी डान्स केला होता.

फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “ते म्हणाले आम्हाला सर्कस नकोय, आम्हाला कोणालाच काही सांगायचं नाहीये. आधीच सोशल मीडियावर व्हायरल झालेले मीम्स आणि इतर पोस्ट पाहून आम्ही लग्नाविषयी चिंतेत होतो. त्यामुळे कोणालाच काही न सांगता लग्न समारंभ पार पाडण्याचा निर्णय घेतला. आम्ही लग्नाची शॉपिंगसुद्धा करू शकलो नव्हतो. जे काही सामान लागणार होतं, ते आणण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी ठराविक माणसं नेमली होती. कारण आम्ही बाहेर कुठेच जाऊ शकत नव्हतो. जर आम्ही बाहेर पडलो असतो, तर लोकांना लग्नाविषयी लगेच समजलं असतं. पण अखेर जेव्हा इमारतीला रोषणाई लावण्यात आली आणि सब्यसाची यांच्याकडून डिझायनर कपडे आले, तेव्हा सर्वांना समजलं.”

पहा फोटो-

“सर्वकाही खूपच सुंदर होतं. लग्नातील सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे वरात. पाचव्या मजल्यावरून सातव्या मजल्यावर ही वरात गेली होती. मजल्यावरील पॅसेजमध्ये आम्ही भांगडा करत होतो. मला घोड्यावरून रणबीरची वरात काढायची होती. पण असं केलं असतं तर पुन्हा पापाराझींचं लक्ष वेधलं असतं, म्हणून तो प्लॅन रद्द केला. रणबीर आणि आलियाने लग्नासाठी खूप काही प्लॅन केलं होतं. त्यांना दक्षिण आफ्रिकेत लग्न करायचं होतं. मात्र अखेर घरातच त्यांनी लग्नगाठ बांधली. दोन वर्षांपासून आम्ही विवाहस्थळाविषयी विचार करत होतो. पण जे झालं ते खूपच सुंदर होतं”, असं त्यांनी सांगितलं. रणबीर-आलियाने मुंबईतल्या ‘वास्तू’ या निवासस्थानी 14 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली. रणबीरच्या या बंगल्याच्या बाल्कनीतच त्यांचं लग्न पार पडलं. यावेळी फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत