AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला सलमानच्या सुरक्षेमुळे…

अभिनेता सलमान खान सध्या चिंतेत आहे. कारण त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत आणखी वाझ करण्यात आली आहे. कारण त्यांची हत्या बिश्नोई गँगने केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ज्यांनी सलमान खानला मारण्याची धमकी दिलीये. यावर आता सलमानचा भाऊ अरबाज खानने प्रतिक्रिया दिली आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला सलमानच्या सुरक्षेमुळे...
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 16, 2024 | 5:53 PM
Share

Arbaaz Khan On Salman Khan Safety : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे खान कुटुंबीय चिंतेत आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर पहिल्यांदाच अरबाजने खानने मौन तोडले आहे. सलमानच्या सुरक्षेसाठी ते सर्वजण काय करत आहेत हे त्याने सांगितले आहे. सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई गँगने आधीच धमकी दिली आहे. सलमान खानशी जवळीकतेमुळे बाबा सिद्दिकी यांच्या हत्या केल्याचं लॉरेन्स बिश्नोई गँगने म्हटले आहे. त्यामुळे सलमान खानच्या जीवाला धोका असून सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

सिद्दीकी यांच्या निधनानंतर काळजी वाढली

सलमानचा भाऊ अरबाज खान याने बाबा सिद्दिकी यांच्या निधनानंतर ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, आम्ही पूर्णपणे ठीक आहोत असे मी म्हणणार नाही. अरबाज खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘बंद सिंह चौधरी’चे प्रमोशन करत आहे. अभिनेत्याने सांगितले की बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर सध्या कुटुंबात प्रत्येकजण काळजीत आहे.

यादरम्यान अरबाज पुढे म्हणाला की, ‘या सगळ्यात मला माझ्या चित्रपटाचे प्रमोशनही करायचे आहे, त्यासाठी मी कटिबद्ध आहे. माझा चित्रपट २५ ऑक्टोबरला येत आहे आणि तो प्रदर्शित होईल याची मला खात्री करावी लागेल. खूप काही घडतंय. परंतु मला माझे काम करावे लागेल.

सलमानच्या सुरक्षेबद्दल काय म्हणाला अरबाज

अरबाज खानला विचारण्यात आले की, सलमानचे कुटुंब त्याच्या संरक्षणासाठी कसे प्रयत्न करत आहे? कुटुंब त्याचा मोठा भाऊ सलमानची सुरक्षा कशी हाताळत आहे, यावर तो म्हणाला, ‘आम्ही शक्य तितके प्रयत्न करत आहोत. सरकार आणि पोलिसांसह प्रत्येकजण या गोष्टीची काळजी घेत आहेत.  तो (सलमान) सुरक्षित राहावा यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि सध्या आपल्याला असेच राहायचे आहे.’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर तीन जणांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. पण पोलीस वेगवेगळ्या अँगलने याचा तपास करत आहेत.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण