इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीने सहकलाकाराच्या कानाखाली वाजवली; नेमकं काय घडलं?

दीपिकाने म्हटलं होतं की मालिकेवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून तिने अनससोबतचा गैरसमज दूर केला. मात्र त्या घटनेनंतर दीपिका आणि आपल्यात काहीच ठीक होऊ शकणार नाही, असं अनसने म्हटलं होतं. या वादामुळेच मालिकेचा टीआरपीसुद्धा घसरू लागला होता, असंही तो म्हणाला होता.

इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीने सहकलाकाराच्या कानाखाली वाजवली; नेमकं काय घडलं?
Deepika Singh and Anas RashidImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 3:30 PM

मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : काही वर्षांपूर्वी स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिया और बाती हम’ ही मालिका सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. या मालिकेतील दीपिका सिंह आणि अनस राशिद यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. जवळपास पाच वर्षे चाललेल्या या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग होता. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे पडद्यावर दीपिका आणि अनस एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसले तरी खऱ्या आयुष्यात ते एकमेकांशी बोलणंही टाळायचे. जवळपास दोन वर्षांपर्यंत या दोघांमध्ये हा वाद सुरू होता. यामागचं कारण म्हणजे मालिकेच्या एका एपिसोडच्या शूटिंगदरम्यान दीपिकाने थेट अनसच्या कानाखाली वाजवली होती.

‘दिया और बाती हम’ या मालिकेतील एक सीनमध्ये ‘सूरज’ (अनस राशिद) आणि ‘संध्या’ (दीपिका सिंह) यांचा रोमान्स दाखवायचा होता. मात्र या शूटिंगदरम्यान दोन्ही कलाकारांमध्ये मोठा गैरसमज निर्माण झाला. असं म्हटलं जातं शूटिंगदरम्यान अनस राशिदने प्रॉडक्शन टीमकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे नीट लक्ष दिलं नाही. त्यामुळे ज्या सीनमध्ये त्याला दीपिकाच्या कमरेला पकडायचं होतं, तेव्हा चुकून त्याने तिला समोरून स्पर्श केला. या शूटदरम्यान दीपिका अनकम्फर्टेबल झाली आणि रागाच्या भरात तिने थेट अनसच्या कानाखाली वाजवली.

हे सुद्धा वाचा

या घटनेनंतर सेटवर खूप मोठा वाद निर्माण झाला. त्यावेळी दीपिका तो शोसुद्धा सोडणार होती. इतकंच नव्हे तर या घटनेनंतर दोघांनी जवळपास दोन वर्षांपर्यंत अबोला धरला होता. हे प्रकरण नंतर इतकं वाढलं होतं की अखेर सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनलाही त्यात हस्तक्षेप करावा लागला होता. दोघांनी शूटिंग सुरू ठेवलं असलं तरी नंतर कधीच ते एकमेकांसोबत मोकळेपणे वागू शकले नव्हते. याप्रकरणी दोघांनी काही मुलाखतींमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

दीपिकाने म्हटलं होतं की मालिकेवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून तिने अनससोबतचा गैरसमज दूर केला. मात्र त्या घटनेनंतर दीपिका आणि आपल्यात काहीच ठीक होऊ शकणार नाही, असं अनसने म्हटलं होतं. या वादामुळेच मालिकेचा टीआरपीसुद्धा घसरू लागला होता, असंही तो म्हणाला होता.

दीपिकाने 2011 मध्ये ‘दिया और बाती हम’ या स्टार प्लस वाहिनीवरील मालिकेतून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यामध्ये तिने संध्याची भूमिका साकारली होती. ही मालिका तब्बल पाच वर्षे चालली होती. अखेर सप्टेंबर 2016 मध्ये या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर 2018 मध्ये ती ‘द रिअल सोलमेट’ या वेब सीरिजमध्ये झळकली. दीपिकाने 2 मे 2014 रोजी तिच्याच मालिकेचा दिग्दर्शक रोहित राज गोयलशी लग्न केलं. 2017 मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर तिने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला. मध्यंतरीच्या काळात ती शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेत होती.

Non Stop LIVE Update
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.