AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी भडकला दिलजित दोसांझ; म्हणाला “ही 100 टक्के सरकारची नालायकी”

सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी दिलजित दोसांझने सरकारला ठरवलं दोषी; राजकारणाबद्दल म्हणाला..

सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी भडकला दिलजित दोसांझ; म्हणाला ही 100 टक्के सरकारची नालायकी
दिलजित दोसांझ, सिद्धू मूसेवालाImage Credit source: Twitter
| Updated on: Dec 04, 2022 | 2:49 PM
Share

मुंबई: पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी प्रसिद्ध गायक दिलजित दोसांझने सरकारला दोष दिला आहे. गायक शुभदीप सिंग सिद्धू हा सिद्धू मूसेवाला म्हणून ओळखला जायचा. 29 मे रोजी त्याची पंजाबमधील मनसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलजितने सिद्धूच्या हत्येवर भाष्य केलं आहे. “ही 100 टक्के सरकारची नालायकी आहे”, अशा शब्दांत त्याने टीका केली.

“एक कलाकार कोणाचंच वाईट करू शकत नाही, हे मी स्वत:च्या अनुभवातून बोलतोय. त्याचा कोणाशी वाद असेल, यावर माझा विश्वासच नाही. त्यामुळे कोणी एखाद्याचा जीव का घेऊ शकेल? ही अत्यंत दु:खद बाब आहे. त्याच्याबद्दल बोलणंही कठीण होतंय. तुमचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याचा जीव गेला तर कसं वाटेल. त्याचे आई-वडील कसं जगत असतील? त्यांच्या दु:खाची कल्पनाही आपण करू शकत नाही”, असं दिलजित म्हणाला.

सरकारला दोष देत दिलजित पुढे म्हणाला, “ही 100 टक्के सरकारची नालायकी आहे. हे राजकारण आहे आणि राजकारण खूप घाणेरडं आहे. देवाकडे आपण प्रार्थना करू शकतो की त्यांना न्याय मिळू दे आणि पुन्हा अशी घटना घडू नये. याआधीही कलाकारांचा जीव घेतला गेला. माझ्या मते 100 टक्के ही सरकारची चूक आहे.”

पंजाब पोलिसांनी ज्या 424 जणांची सुरक्षा तात्पुरती काढून घेतली होती, त्यात सिद्धूचाही समावेश होता. सुरक्षा काढून घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याची हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार याने सिद्धू मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...