AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुक्मिणीला पळवून नेलं आणि…, श्रीकृष्णाबद्दल असं का म्हणाली दिशा पटानीची बहीण, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

दिशा पटानीची बहीण माजी लष्करी अधिकारी खुशबू पटानी यांचं श्रीकृष्णाबद्दल मोठं वक्तव्य, 'रुक्मिणीला पळवून नेलं आणि...', अनेकांकडून संताप व्यक्त, सध्या सर्वत्र खुशबू यांच्या वक्तव्याची चर्चा...

रुक्मिणीला पळवून नेलं आणि..., श्रीकृष्णाबद्दल असं का म्हणाली दिशा पटानीची बहीण, 'तो' व्हिडीओ व्हायरल
फाईल फोटो
| Updated on: Aug 13, 2025 | 8:44 AM
Share

अभिनेत्री दिशा पटानी हिची बहीण आणि माजी लष्करी अधिकारी खुशबू पटानी कायम वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी खुशबू पटानी यांनी एक अथान मुलीला तिच्या आईपर्यंत पोहोचवलं होतं. तेव्हा सर्वत्र खुशबू पटानी यांचं कौतुक झालं. त्यानंतर खुशबू पटानी यांनी कथावाचक अनिरुद्धाचार्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत मुलींची बाजू मांडली. तेव्हा मात्र खुशबू यांच्यावर टीका करण्यात आली. आता खुशबू यांनी श्रीकृष्ण यांच्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे खुशबू तुफान चर्चेत आहेत.

खुशबू पटानी यांनी प्रेम, लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या असं काही बोलून गेल्या ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. श्रीकृष्ण यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर खुशबू यांनी टीकेचा सामना करावा लागत आहे. सध्या खुशबू यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

व्हिडीओ शेअर करत खुशबू म्हणाल्या, ‘श्रीकृष्ण यांनी रुक्मिणीला द्वारकेत पळवून नेलं होतं. असा विचार तुम्ही करणार देखील नाही. हे सर्व समाजाच्या विरोधात आहे… असं तुम्हाला वाटेल. पण श्रीकृष्णाने समाजातील सर्व आदर्श मोडले आहेत…’ खुशबू पटानी यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देखील देत आहेत.

खुशबू यांच्या व्हिडीओवर संताप व्यक्त करत एक नेटकरी म्हणाला, ‘कलियूगातील महिला… श्रीकृष्णाने समाजातील कोणतेच नियम मोडले नाहीत. धर्माच्या संरक्षण आणि प्रतिष्ठेला अडथळा ठरणारे बंधन त्यांनी तोडले आहे.’ तर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘विनाशकालेय विपरीत बुद्धि’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ही कधीच सुधारणार नाही…’, ‘भगवान श्रीकृष्णजींनी तुमच्यासारख्या विकृत आणि घृणास्पद कृत्यांना संरक्षण देण्यासाठी नाही तर धर्म आणि धार्मिक शिष्टाचाराचे संतुलन राखण्यासाठी कायद्याचं पालन केलं आहे.’ असं देखील एक नेटकरी म्हणाला आहे.

कथावाचक अनिरुद्धाचार्या यांना काय म्हणाल्या खुशबू…

अनिरुद्धाचार्य म्हणाले, ‘काही मुलं 25 वर्षांच्या मुलींची निवड करतात आणि त्यांनी घेवून येतात. पण त्या 25 वर्षांच्या मुली अधीच 4 ठिकाणी तोंड मारून आलेल्या असतात…’, या वादग्रस्त विधानावर खुशबू यांनी टीका केली. बाबाला जर लिव्हइन रिलेशनशिपची समस्या आहे, तर मुलांवर बाबा प्रश्न का नाही उपस्थित करत. जे लग्नाआधी रिलेशनशिपमध्ये राहण्याची निवड करतात. त्यांनी फक्त मुलींवर प्रश्न का उपस्थित केला.’ खुशबू कायम त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.