AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुक्मिणीला पळवून नेलं आणि…, श्रीकृष्णाबद्दल असं का म्हणाली दिशा पटानीची बहीण, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

दिशा पटानीची बहीण माजी लष्करी अधिकारी खुशबू पटानी यांचं श्रीकृष्णाबद्दल मोठं वक्तव्य, 'रुक्मिणीला पळवून नेलं आणि...', अनेकांकडून संताप व्यक्त, सध्या सर्वत्र खुशबू यांच्या वक्तव्याची चर्चा...

रुक्मिणीला पळवून नेलं आणि..., श्रीकृष्णाबद्दल असं का म्हणाली दिशा पटानीची बहीण, 'तो' व्हिडीओ व्हायरल
फाईल फोटो
| Updated on: Aug 13, 2025 | 8:44 AM
Share

अभिनेत्री दिशा पटानी हिची बहीण आणि माजी लष्करी अधिकारी खुशबू पटानी कायम वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी खुशबू पटानी यांनी एक अथान मुलीला तिच्या आईपर्यंत पोहोचवलं होतं. तेव्हा सर्वत्र खुशबू पटानी यांचं कौतुक झालं. त्यानंतर खुशबू पटानी यांनी कथावाचक अनिरुद्धाचार्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत मुलींची बाजू मांडली. तेव्हा मात्र खुशबू यांच्यावर टीका करण्यात आली. आता खुशबू यांनी श्रीकृष्ण यांच्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे खुशबू तुफान चर्चेत आहेत.

खुशबू पटानी यांनी प्रेम, लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या असं काही बोलून गेल्या ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. श्रीकृष्ण यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर खुशबू यांनी टीकेचा सामना करावा लागत आहे. सध्या खुशबू यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

व्हिडीओ शेअर करत खुशबू म्हणाल्या, ‘श्रीकृष्ण यांनी रुक्मिणीला द्वारकेत पळवून नेलं होतं. असा विचार तुम्ही करणार देखील नाही. हे सर्व समाजाच्या विरोधात आहे… असं तुम्हाला वाटेल. पण श्रीकृष्णाने समाजातील सर्व आदर्श मोडले आहेत…’ खुशबू पटानी यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देखील देत आहेत.

खुशबू यांच्या व्हिडीओवर संताप व्यक्त करत एक नेटकरी म्हणाला, ‘कलियूगातील महिला… श्रीकृष्णाने समाजातील कोणतेच नियम मोडले नाहीत. धर्माच्या संरक्षण आणि प्रतिष्ठेला अडथळा ठरणारे बंधन त्यांनी तोडले आहे.’ तर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘विनाशकालेय विपरीत बुद्धि’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ही कधीच सुधारणार नाही…’, ‘भगवान श्रीकृष्णजींनी तुमच्यासारख्या विकृत आणि घृणास्पद कृत्यांना संरक्षण देण्यासाठी नाही तर धर्म आणि धार्मिक शिष्टाचाराचे संतुलन राखण्यासाठी कायद्याचं पालन केलं आहे.’ असं देखील एक नेटकरी म्हणाला आहे.

कथावाचक अनिरुद्धाचार्या यांना काय म्हणाल्या खुशबू…

अनिरुद्धाचार्य म्हणाले, ‘काही मुलं 25 वर्षांच्या मुलींची निवड करतात आणि त्यांनी घेवून येतात. पण त्या 25 वर्षांच्या मुली अधीच 4 ठिकाणी तोंड मारून आलेल्या असतात…’, या वादग्रस्त विधानावर खुशबू यांनी टीका केली. बाबाला जर लिव्हइन रिलेशनशिपची समस्या आहे, तर मुलांवर बाबा प्रश्न का नाही उपस्थित करत. जे लग्नाआधी रिलेशनशिपमध्ये राहण्याची निवड करतात. त्यांनी फक्त मुलींवर प्रश्न का उपस्थित केला.’ खुशबू कायम त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.