AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटानंतर खचली ईशा देओल, आई हेमा मालिनी यांनी दिला मोलाचा सल्ला; म्हणाल्या “प्रेम कधीच..”

अभिनेत्री ईशा देओल गेल्या वर्षी पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली. लग्नाच्या 11 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. ईशा आणि भरत एकमेकांना लहानपणापासून ओळखायचे. घटस्फोटानंतर ईशाचा प्रेमावरून विश्वासच उडाला होता. तेव्हा आई हेमा मालिनी यांनी मोलाचा सल्ला दिला.

घटस्फोटानंतर खचली ईशा देओल, आई हेमा मालिनी यांनी दिला मोलाचा सल्ला; म्हणाल्या प्रेम कधीच..
Hema Malini and Esha DeolImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 20, 2025 | 9:49 AM
Share

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने बालमित्र भरत तख्तानीशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 11 वर्षांनंतर ईशा आणि भरत यांनी घटस्फोट घेतला. गेल्या वर्षी हे दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले. त्यांना मिराया आणि राध्या या दोन मुली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशा तिच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आई हेमा मालिनी यांनी तिला कशापद्धतीने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहायला आणि प्रेमावरील विश्वास कधीच न गमवायला शिकवलं, याविषयी तिने सांगितलं.

“मला वाटतं की प्रत्येक आईला तिच्या मुलींना, विशेषत: मुलांना ही गोष्ट सांगायची असेल.. हो ते (मुलं) आपोआपच ते करतात पण मुलींसाठी, लग्नानंतरही स्वत:ची ओळख असणं खूप महत्त्वाचं आहे. आईने मला नेहमीच हे सांगितलं आहे की तू खूप मेहनत घेतलंस, स्वत:ची वेगळी ओळख बनवलीस आणि तुझं एक स्वतंत्र प्रोफेशन आहे. जरी तुम्ही नाव कमावलं नसाल तरी तुमच्या हातात काम असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते कधीच थांबवू नकोस. सतत काम करण्याचा प्रयत्न कर. आर्थिकदृष्ट्या नेहमीच स्वावलंबी राहा. तू कोट्यधीशाशी लग्न केलंस तरी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहणं हे महिला म्हणून तुला खूप अनोखं बनवतं”, असं ईशा म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

आईने दिलेल्या शिकवणीबद्दल तिने पुढे सांगितलं, “आणखी एक चांगली गोष्ट तिने मला सांगितली की आपण आयुष्यात अनेक गोष्टी करतो.. काम, स्वत:ची काळजी असं सर्वकाही. पण आयुष्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ते कधीच संपू नये.. तो म्हणजे रोमान्स. ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुमच्यात नवचैतन्य संचारतं. ही अशी भावना आहे आणि आपल्या सर्वांना ती हवी असते. आईने दिलेला हा सल्ला अजूनही मला चांगलंच लक्षात आहे. पण फक्त त्यावर मी अजून काम केलं नाही.”

यावेळी ईशा कामातून ब्रेक घेण्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. “मी फक्त आणि फक्त माझ्या कुटुंबासाठी ब्रेक घेतला होता. मला दोन मुली आहेत. त्यामुळे एक आई म्हणून मला त्यांना पुरेसा वेळ द्यायचा होता. मातृत्व अनुभवण्यासाठी मी हा ब्रेक घेतला होता. मला नेहमीपासून हेच करायचं होतं जे प्रत्येक मुलीला करायचं असतं.. लग्न करणं, मुलांना जन्म घालणं आणि त्यांचं संगोपन करणं. एक आई म्हणून मी माझी भूमिका व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करतेय. मी अभिनेत्री आहे याचा आनंद माझ्या मुलींनाही आहे”, असं ती म्हणाली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.