AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांच्या निधनानंतर केस का कापले नाहीत? विचारणाऱ्याला गश्मीर महाजनीचं सडेतोड उत्तर, म्हणाला ‘त्यांची जबाबदारी..’

अभिनेता गश्मीर महाजनीने आस्क मी एनिथिंग या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका युजरने त्याला वडिलांच्या निधनानंतर टक्कल का केलं नाही, याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर गश्मीरने काय उत्तर दिलं, ते जाणून घेऊयात..

वडिलांच्या निधनानंतर केस का कापले नाहीत? विचारणाऱ्याला गश्मीर महाजनीचं सडेतोड उत्तर, म्हणाला 'त्यांची जबाबदारी..'
रवींद्र महाजनी, गश्मीर महाजनी
| Updated on: Sep 09, 2023 | 9:27 AM
Share

मुंबई | 9 सप्टेंबर 2023 : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचं जुलै महिन्यात कार्डिॲक अरेस्टने निधन झालं. तळेगाव इथल्या एका सदनिकेत ते मृतावस्थेत आढळले होते. ते मुलगा गश्मीर महाजनीसोबत किंवा कुटुंबीयांसोबत ते का राहत नव्हते, असा प्रश्न त्यांच्या निधनानंतर अनेकांना पडला. गश्मीरने वडिलांबाबतच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत दिली. त्याचप्रमाणे इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनद्वारे गश्मीर सतत चाहत्यांच्या संपर्कात आहे. या सेशनदरम्यानही काही नेटकऱ्यांनी त्याला वडिलांबद्दल प्रश्न विचारले. एका युजरने गश्मीरला वडिलांच्या निधनानंतर केस का कापले नाहीत, असा सवाल केला. त्यावर गश्मीरने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

वडिलांच्या निधनानंतर टक्कल का केलं नाही?

वडील वारले की केस कापतात यावर काय बोलाल? मला तुमचा दृष्टीकोन ऐकायला आवडेल, असा प्रश्न एका युजरने केला. त्यावर गश्मीरने लिहिलं, ‘मी जे कार्य करतो त्यावर माझ्या कुटुंबाचं अर्थार्जन होतं. टक्कल केलं असतं तर हातातून कामं गेली असती. जे माझ्यावर अवलंबून आहेत त्यांची जबाबदारी तुम्ही घेतली असती का?’ वयाच्या पंधराव्या वर्षापासून गश्मीरने कुटुंबाची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली होती. बँकेचं कर्ज झाल्यानंतर वडील रवींद्र महाजनी हे घर सोडून निघून गेले आणि त्यानंतर गश्मीरने सर्व कर्ज फेडलं. त्या संघर्षाच्या काळाबद्दल तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला होता.

रवींद्र महाजनी यांचा कुटुंबीयांशी संपर्कच नव्हता

“मी 15 वर्षांचा असतानाच ते आमच्यापासून वेगळे झाले. गेल्या तीन वर्षांपासून ते फारच एकटे राहू लागले होते. मला जेव्हा मुलगा झाला, तेव्हा जन्माच्या वेळीच त्यांनी नातवाचा चेहरा पाहिला होता. त्यानंतर ते पुन्हा निघून गेले आणि परत आलेच नाहीत. मी अधूनमधून त्यांना नातवाचे फोटो आणि व्हिडीओ पाठवायचो. एक-दोनदा त्यांनी ते पाहिलं आणि नंतर माझा नंबर ब्लॉक केला. ही तीन-साडेतीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. यात मी कोणालाच दोष देत नाही. पण त्यांची बाजू काय असेल ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कदाचित नातवाचे फोटो आणि व्हिडीओ पाहून ते हळवे होऊ लागले होते. त्यामुळे पुन्हा त्यांना कुटुंबात अडकायचं नव्हतं. म्हणून त्यांनी आमचे नंबर ब्लॉक केले असावेत”, असं त्याने या मुलाखतीत सांगितलं होतं.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.