गौरी खानचं खरं नाव माहितीये का? गौरीनेलग्नावेळी शाहरूखचंही बदललं होतं नाव

बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते आणि लाडके कपल म्हणून अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्याकडे पाहिलं जातं. पण अनेकांना गौरीचे लग्नाआधीचे खरे नाव माहित नसेल. एवढच नाही तर गौरीने लग्न करण्यासाठी चक्क शाहरूखचेही नाव बदलले होते.

गौरी खानचं खरं नाव माहितीये का? गौरीनेलग्नावेळी शाहरूखचंही बदललं होतं नाव
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 5:44 PM

बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते आणि लाडके कपल म्हणून अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांना ओळखलं जातं. या कपलची लव्हस्टोरी देखील सर्वांना माहिती आहे. तसेच शाहरूख खान आणि गौरी खानचे अनेक लग्नाचे, सेटवरचे फोटे नेहमीच व्हायरल होत असतात किंवा उत्सुकता म्हणून सर्च करत असतात. त्यांच्या जुन्या फोटोंना चाहत्यांकडून जास्त पसंतीही मिळते.

गौरी खानचे लग्नाआधीचे खरे नाव काय आहे? 

गौरी खान आणि शाहरूख खानच्या लव्हस्टोरीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. पण गौरी खानचे लग्नाआधीचे खरे नाव काय आहे हे बऱ्याच जणांना माहित नसेल. गौरी खानचे लग्नाआधीचे नाव आहे गौरी छिब्बर. होय, गौरीचं लग्नाआधीचे आडनाव हे छिब्बर होते. गौरीच्या वडिलांचे नाव कर्नल रमेशचंद्र छिब्बर होते. तर, आईचे नाव सविता छिब्बर होते.

गौरीचे बालपण दिल्लीतील पंचशील पार्कमध्ये गेलं. गौरीने वसंत विहार येथील मॉर्डन स्कूलमधून शिक्षण घेतलं. तिने दिल्लीच्या प्रतिष्ठित लेडी श्री राम कॉलेजमधून इतिहासमध्ये पदवी प्राप्त केली आहे. गौरी आज तिच्या फॅशन आणि इंटिरियर डिझायनिंगमुळे ओळखली जाते.यासाठी तिने NIFT मधून सहा महिन्यांचा कोर्सही केला आहे.

गौरीच्या वडीलांचाही कपड्यांचा व्यवसाय 

दरम्यान गौरीचे वडील कपड्यांचा व्यवसाय करतात. या व्यवसायाचा भाग होण्यासाठी गौरीने नॅशनल इन्सिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण घेतले होते. दरम्यान गौरी आता एक यशस्वी आणि प्रसिद्ध व्यावसायिका आहे. एवढच नाही गौरीची एकूण संपत्ती ही 1600 कोटी रुपये आहे. ती रेड चिलीज एंटरटेनमेंटची सह-संस्थापकही आहे.

दरम्यान गौरी छिब्बर ही धर्माने मुस्लीम असलेला शाहरुख खानच्या प्रेमात पडली. गौरी आणि शाहरूखच्या प्रेमाला आणि लग्नाला तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र दोघांनी तरीही लग्न केलं. गौरी शाहरूखपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. ती शाहरूखला भेटली तेव्हा ती अवघ्या 14 वर्षांची होती.

गौरीने शाहरूखचे नावही बदलले होते

आई-वडिलांच्या विरोधाच्या भितीने गौरीने लग्नावेळी शाहरूखचे नावही बदलले होते. गौरीने शाहरुख खानचे नाव बदलून अभिनव ठेवले होते. कारण गौरी हिंदू ब्राह्मण कुटुंबातील, तर शाहरुख मुस्लिम, त्यामुळे त्यांच्या लग्नात धर्म हा मोठा मुद्दा बनला होता. त्यांच्या धार्मिक श्रद्धा वेगळ्या असल्याने गौरीचे पालक त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते.

याशिवाय शाहरुखने नुकतेच बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता आणि तो इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी धडपडत होता. आई-वडीलांच्या भितीने गौरीने त्यांना शाहरूखचं नाव हे अभिनव सांगितलं. होतं. बऱ्याच दिवसांपर्यंत त्यानाही शाहरूखचे खरे नाव माहित नव्हते. मात्र जेव्हा बॉलिवूडमध्ये शाहरूखच्या नावाची जेव्हा चर्चा व्हायला लागली तेव्हा गौरीच्या आई-वडिलांना त्याच्या नावापासून ते कामापर्यंत सर्व माहिती समजली.

मन्नत धार्मिक ऐक्याचे प्रतीक मानले जाते 

अनेक आव्हानांचा सामना करत शाहरुख खानने प्रचंड मेहनत करत शेवटी पत्नी आणि मुलांना असे आयुष्य दिले आहे जे एखादा पुरुष आपल्या कुटुंबीयांना देण्यासाठी धडपड करत असतो. शाहरुख खानच्या घरात ईदही साजरी केली जाते आणि दिवाळीही. त्याचे घर मन्नत धार्मिक ऐक्याचे प्रतीक मानले जाते. गौरी छिब्बर खान आणि शाहरूख खान म्हणजे बॉलिवूडचे परफेक्ट कपल मानले जातात.

'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.