Bigg Boss | मनीषा राणीकडून ‘बिग बॉस’ची पोलखोल; मोबाइलच्या वापरापासून स्क्रिप्टेड एपिसोडपर्यंत केला खुलासा

सिझन संपल्यानंतर मनीषाने तिच्या युट्यूब व्लॉगमध्ये शोविषयी काही खुलासे केले आहेत. बिग बॉससाठी सेलिब्रिटींची निवड कशी होते, घरात मोबाइल फोनचा वापर होतो का, बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड असतो का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तिने या व्लॉगद्वारे दिली आहेत.

Bigg Boss | मनीषा राणीकडून 'बिग बॉस'ची पोलखोल; मोबाइलच्या वापरापासून स्क्रिप्टेड एपिसोडपर्यंत केला खुलासा
Manisha RaniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 2:56 PM

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन चांगलाच गाजला. या सिझनमध्ये मनीषा राणीला खूप लोकप्रियता मिळाली. ती ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती, मात्र ट्रॉफी न जिंकताच तिला माघार घ्यावी लागली. ‘बिग बॉस ओटीटी 2’चं विजेतेपद एल्विश यादवने पटकावलं होतं. आता सिझन संपल्यानंतर मनीषाने तिच्या युट्यूब व्लॉगमध्ये शोविषयी काही खुलासे केले आहेत. बिग बॉससाठी सेलिब्रिटींची निवड कशी होते, घरात मोबाइल फोनचा वापर होतो का, बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड असतो का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तिने या व्लॉगद्वारे दिली आहेत.

29 वर्षीय मनीषाला विचारलं गेलं की, सलमान खानचा हा रिॲलिटी शो खरंच स्क्रिप्टेड असतो का? तुम्ही कॅमेरासमोर जेवण बनवता, इतर कामं करता, आपापसांत भांडता… हे सर्व नाटकी असतं का? त्यावर मनीषाने सांगितलं की, “असं काहीच नसतं. बिग बॉसच्या घरात फक्त तेच घडतं, जे टीव्हीवर प्रेक्षकांना दाखवलं जातं. सेलिब्रिटी छोटा असो किंवा मोठा.. सर्वांसाठी नियम एकसारखेच असतात. स्पर्धकांना मर्यादित सामान मिळतं आणि त्यातच त्यांना सर्वकाही सांभाळावं लागतं. हा शो अजिबात स्क्रिप्टेड नाही. मी या शोमध्ये शेवटपर्यंत राहिली आहे, त्यामुळे मला सर्वकाही माहीत आहे.”

बिग बॉसच्या घरात पूजा भट्ट फोन वापरत होती, असा आरोप अनेकदा सोशल मीडियावर झाला. त्यावरही मनीषाने उत्तर दिलं. “शोमध्ये कोणालाच फोन वापरण्याची परवानगी नाही. जर पूजा भट्टच्या ऐवजी आलिया भट्ट जरी स्पर्धक म्हणून आली असती, तरी तिला फोन मिळाला नसता”, असं तिने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

मनीषाने हेसुद्धा सांगितलं की बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी कोणतेच ऑडिशन्स होत नाहीत. मात्र स्पर्धकांना आधी बिग बॉसच्या ऑफिसमध्ये बोलावलं जातं. त्यावेळी त्यांचा इंटरव्ह्यू होतो. त्यानंतर स्पर्धकांची अंतिम निवड होते. शो सुरू होण्याच्या दोन महिन्याआधीच स्पर्धकाला त्याची निवड झाली की नाही याबद्दल कळतं. मात्र निर्मात्यांसोबत त्यांना करार करावा लागतो. या करारानुसार ते शोबद्दलची कोणतीच माहिती बाहेर सांगू शकत नाहीत.

Non Stop LIVE Update
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....